शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

तांत्रिक अडचणींमध्ये अडकली तीन गावांची पाणीपुरवठा योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:58 IST

जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे १८ वर्षांपूर्वी जऊळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जऊळका रेल्वे येथे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. तीन गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार होता; परंतू तांत्रिक अडचणींमध्ये योजना फसल्याने ही बाब अद्याप शक्य होऊ शकली नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन थातूर- मातूर योजना चालू करुन पाणीपुरवठा योजना सुरु असल्याचा केवळ देखावा केल्या जात आहे.  

जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही. जलशुद्धीकरणाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही कामे मार्गी लागू शकली नाहीत. यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.महाराष्टÑ जीवन प्राधिकरण योजनेअतर्गंत १८ वर्षांपूर्वी जऊळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जऊळका रेल्वे येथे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, याअंतर्गत अद्याप पाणीपुरवठा झालेला नाही. जऊळका गावालगत काटेपूर्णा नदिवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मीती झाली. तेथूनच तीन गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार होता; परंतू तांत्रिक अडचणींमध्ये योजना फसल्याने ही बाब अद्याप शक्य होऊ शकली नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन थातूर- मातूर योजना चालू करुन पाणीपुरवठा योजना सुरु असल्याचा केवळ देखावा केल्या जात आहे.  जऊळकानजिक असलेल्या प्रकल्पाचाही ग्रामस्थांना कुठलाच फायदा होत नाही. तसेच शेतीला सिंचन करण्याची शेतकºयांची इच्छा आहे; पण रेल्वे लाईन गेल्यामुळे पाईपलाईन घेण्यासाठी परवानगी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूणच या सर्व अडचणींमुळ जऊळका रेल्वे, उडी आणि वरदरी बु. या तीन गावांमधील ग्रामस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी