शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर चौसाळ्याचा पाणी पुरवठा सुरू; ग्रामस्थांची वणवण थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:11 IST

चौसाळा: ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे.

ठळक मुद्दे मानोरा तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. चौसाळ्यातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत लोकमतने २५ फेब्रुवारीच्या अंकात ‘पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम संथगतीने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर प्रशासनाने दखल घेत जलवाहिनीचे काम त्वरीत करू न घेत १ मार्चपासून चौसाळ्यातील पाणी पुरवठा सुरू केला.

चौसाळा: पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे मानोरा तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, तर ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे.

मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पातून १६ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा बंद करून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. त्यामुळे चौसाळ्याचा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यातच चौसाळा येथील चौसाळा आणि गारटेक हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आणि ग्रामस्थांना शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. चौसाळ्यातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत लोकमतने २५ फेब्रुवारीच्या अंकात ‘पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम संथगतीने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून पाणी पुरवठा सुरू न केल्यास ५ मार्च रोजी कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला. लोकमतने या संदर्भातही पाणीटंचाई निवारणासाठी चौसाळ्याचे ग्रामस्थ आक्रमक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर प्रशासनाने दखल घेत जलवाहिनीचे काम त्वरीत करू न घेत १ मार्चपासून चौसाळ्यातील पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट थांबली आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी