शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौसाळ्याचा पाणी पुरवठा सुरू; ग्रामस्थांची वणवण थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:11 IST

चौसाळा: ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे.

ठळक मुद्दे मानोरा तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. चौसाळ्यातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत लोकमतने २५ फेब्रुवारीच्या अंकात ‘पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम संथगतीने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर प्रशासनाने दखल घेत जलवाहिनीचे काम त्वरीत करू न घेत १ मार्चपासून चौसाळ्यातील पाणी पुरवठा सुरू केला.

चौसाळा: पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे मानोरा तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, तर ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे.

मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पातून १६ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा बंद करून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. त्यामुळे चौसाळ्याचा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यातच चौसाळा येथील चौसाळा आणि गारटेक हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आणि ग्रामस्थांना शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. चौसाळ्यातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत लोकमतने २५ फेब्रुवारीच्या अंकात ‘पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम संथगतीने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून पाणी पुरवठा सुरू न केल्यास ५ मार्च रोजी कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला. लोकमतने या संदर्भातही पाणीटंचाई निवारणासाठी चौसाळ्याचे ग्रामस्थ आक्रमक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर प्रशासनाने दखल घेत जलवाहिनीचे काम त्वरीत करू न घेत १ मार्चपासून चौसाळ्यातील पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट थांबली आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी