शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

  मंगरुळपीर येथे पाणीटंचाई तीव्र; तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 13:56 IST

मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.

ठळक मुद्देसोनल प्रकल्पातील मृतसाठा मोतसावंगा प्रकल्पात वळविण्यासाठी  ४ कोटी १ लाख ८० हजाराचा रुपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची उपयुक्तता आणि इतर तांत्रिकबाबी पडताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने सर्वेक्षणही करण्यात आले.ता या योजनेला अद्याप अंतिम मंजुरीच मिळालेली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

मंगरुळपीर: शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर नियंत्रणासाठी मंगरुळपीर पालिकेच्या प्रस्तावानुसार मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या योजनेला कार्यान्वित होण्यास बराच विलंब लागणार असून, नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

मंगरुळपीर शहरातील पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी तातडीची व तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी सोनल प्रकल्पातील मृतसाठा मोतसावंगा प्रकल्पात वळविण्यासाठी  ४ कोटी १ लाख ८० हजाराचा रुपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची उपयुक्तता आणि इतर तांत्रिकबाबी पडताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने सर्वेक्षणही करण्यात आले असून, या संदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हा प्रशासनाने अहवाल मागितला आहे. त्या अहवालाची पाहणी करण्यात आल्यानंतरच या योजनेला मंजुरी मिळणार आहे. या योजनेचे काम पालिकेच्यावतीने कंत्राटदारामार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे. आता या योजनेला अद्याप अंतिम मंजुरीच मिळालेली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या योजनेंतर्गत सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत १२६०० मीटर अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यामुळे कामाला मोठा कालावधी लागणार असून, अद्याप अंतिम मंजुरीच मिळाली नसल्याने हे काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच सोनल प्रकल्पातील सध्याची मृतसाठ्याची स्थिती पाहतायोजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा किती फायदा मंगरुळपीर शहराला होईल, याबाबत शंकाच आहे.  

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरwashimवाशिमWaterपाणी