शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; मंगरुळपीरवासियांना ११ दिवसांतून एकदा पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:18 IST

​​​​​​​वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.   येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे.

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोतसावंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा उरल्याने भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने पाणी वापराबाबत नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मंगरुळपीर शहराला तालुक्यातील मोतसावंगा येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु यंदा अल्प पावसामुळे या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत या धरणात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. मोतसावंगा धरणातून मंगरुळपीर शहरासह तालुक्यातील इतरही काही गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह अपव्यय टाळण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासह एकूण १५ प्रकल्पांत मिळून ९ टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यातच चांदई, कवठळ, सिंगडोह, मोहरी, सावरगाव, दस्तापूर आणि सार्सी बोथ या प्रकल्पांत शुन्य टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी