शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; मंगरुळपीरवासियांना ११ दिवसांतून एकदा पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:18 IST

​​​​​​​वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.   येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे.

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोतसावंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा उरल्याने भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने पाणी वापराबाबत नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मंगरुळपीर शहराला तालुक्यातील मोतसावंगा येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु यंदा अल्प पावसामुळे या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत या धरणात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. मोतसावंगा धरणातून मंगरुळपीर शहरासह तालुक्यातील इतरही काही गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह अपव्यय टाळण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासह एकूण १५ प्रकल्पांत मिळून ९ टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यातच चांदई, कवठळ, सिंगडोह, मोहरी, सावरगाव, दस्तापूर आणि सार्सी बोथ या प्रकल्पांत शुन्य टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी