शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पूनर्वसित  पांगरखेडा गावात पाण्यासाठी हाहा:कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 16:16 IST

शिरपूर जैन  : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे प्रकल्पामध्ये बुडित क्षेत्रात पांगरखेडा गावाचे शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर २०१३-१४ मध्ये करण्यात आले. पक्के रस्ते , पाणी पुरवठा योजना अशा मुलभूत  गरजा पूनर्वसनाअगोदरच निर्माण करणे बंधनकारक असतांना तसे मात्र करण्यात आले नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने खासगी बोअर कोरडे पडले आहेत.

शिरपूर जैन  : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही. तसेच अंतर्गत रस्ते अद्यापही कच्चेच आहेत. गावात पाणीच नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. 

मालेगाव तालुक्यात मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम २००९ पासून सुरु आहे. या प्रकल्पामध्ये बुडित क्षेत्रात पांगरखेडा गाव समाविष्ट झाले. त्यामुळे या गावाचे शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर २०१३-१४ मध्ये करण्यात आले. यासाठी शासनाने पक्के रस्ते , पाणी पुरवठा योजना अशा मुलभूत  गरजा पूनर्वसनाअगोदरच निर्माण करणे बंधनकारक असतांना तसे मात्र करण्यात आले नाही.  परिणामत: दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने खासगी बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना शेतातील विहिरीवरुन बैलगाडी अथवा टॅ्रक्टर, टँकरने पाणी आणावे लागत आहे. शासनाने पूनर्वसित गावात दोन जलकुंभ बांधले आहेत. त्यापैकी एकाला छिद्र पडले आहे तर दुसरा सार्वजनिक पाणी पुरवठा योजनाच नसल्याने कोरडा आहे. थोडा फार आधार सरपंच फुलंगा चव्हाण यांच्या खासगी बोअरमध्ये असलेल्या जलसाठयाचा गावकऱ्यांना उपयोग होतो. 

याबाबत मागील दहा महिन्यांपासून लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता सार्वजनिक विहिर निर्माण करण्यासाठी निवीदाची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजुनही निविदा कारवाई पूर्ण झाली नसल्याचे समजते. पाणी टंचाईसह गावात पक्के रस्ते नसल्याने रस्त्याची समस्या आहे.

 

२०१३ - १४ मध्ये पांगरखेडा गावाचे पूनवर्सन होऊनही या गावात अद्यापही पाणी पुरवठयाची सोय नाही. रस्ते ही अद्याप कच्चेच आहेत. या एकाप्रकारे आमच्यावर अन्याय आहे.

- संतोष गावंडे, पूनर्वसित पांगरखेडा, रहिवासी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी