शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पूनर्वसित  पांगरखेडा गावात पाण्यासाठी हाहा:कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 16:16 IST

शिरपूर जैन  : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे प्रकल्पामध्ये बुडित क्षेत्रात पांगरखेडा गावाचे शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर २०१३-१४ मध्ये करण्यात आले. पक्के रस्ते , पाणी पुरवठा योजना अशा मुलभूत  गरजा पूनर्वसनाअगोदरच निर्माण करणे बंधनकारक असतांना तसे मात्र करण्यात आले नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने खासगी बोअर कोरडे पडले आहेत.

शिरपूर जैन  : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही. तसेच अंतर्गत रस्ते अद्यापही कच्चेच आहेत. गावात पाणीच नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. 

मालेगाव तालुक्यात मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम २००९ पासून सुरु आहे. या प्रकल्पामध्ये बुडित क्षेत्रात पांगरखेडा गाव समाविष्ट झाले. त्यामुळे या गावाचे शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर २०१३-१४ मध्ये करण्यात आले. यासाठी शासनाने पक्के रस्ते , पाणी पुरवठा योजना अशा मुलभूत  गरजा पूनर्वसनाअगोदरच निर्माण करणे बंधनकारक असतांना तसे मात्र करण्यात आले नाही.  परिणामत: दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने खासगी बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना शेतातील विहिरीवरुन बैलगाडी अथवा टॅ्रक्टर, टँकरने पाणी आणावे लागत आहे. शासनाने पूनर्वसित गावात दोन जलकुंभ बांधले आहेत. त्यापैकी एकाला छिद्र पडले आहे तर दुसरा सार्वजनिक पाणी पुरवठा योजनाच नसल्याने कोरडा आहे. थोडा फार आधार सरपंच फुलंगा चव्हाण यांच्या खासगी बोअरमध्ये असलेल्या जलसाठयाचा गावकऱ्यांना उपयोग होतो. 

याबाबत मागील दहा महिन्यांपासून लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता सार्वजनिक विहिर निर्माण करण्यासाठी निवीदाची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजुनही निविदा कारवाई पूर्ण झाली नसल्याचे समजते. पाणी टंचाईसह गावात पक्के रस्ते नसल्याने रस्त्याची समस्या आहे.

 

२०१३ - १४ मध्ये पांगरखेडा गावाचे पूनवर्सन होऊनही या गावात अद्यापही पाणी पुरवठयाची सोय नाही. रस्ते ही अद्याप कच्चेच आहेत. या एकाप्रकारे आमच्यावर अन्याय आहे.

- संतोष गावंडे, पूनर्वसित पांगरखेडा, रहिवासी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी