शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

साळंबीवासियांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:27 IST

जोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. गावालगतच्या, तसेच शेतशिवारातील विहिरींचा आधार घेऊन येथील ग्रामस्थ आपली तहान भागवित आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी गावाची लोकसंख्या ७०० पेक्षा अधिक आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतमजुरी असून, प्रामुख्याने बंजारा समाजातील लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वी सावरगाव येथून शासकीय योजना राबविण्यात येत होती; परंतु जवळपास १५ वर्षांपूर्वी ती योजनाही बंद पडली. त्यातच गावात हातपंप किंवा सार्वजनिक विहिरीसारखे कोणतेही जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना गावालगत असलेल्या किंवा शेतशिवारातील खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. तहान भागविण्यासाठी महिला मंडळी डोक्यावर हंडा घेऊन किलोमीटर पायपीट करतानाचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गावालगत लहानमोठे जलाशय किंवा तलाव असतानाही येथे शासकीय पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही किंवा लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा झाला नाही.

 गावात कोणतीही शासकीय पाणी पुरवठा योजना नाही किंवा हातपंपही नाही. त्यामुळे आम्हाला गावालगत असलेल्या किंवा शेतातील खाजगी विहिरीवरून पाणी आणून गरजा भागवाव्या लागत आहेत. येथे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.-संजय सातपुते, ग्रामस्थ साळंबी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी