शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साळंबीवासियांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:27 IST

जोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. गावालगतच्या, तसेच शेतशिवारातील विहिरींचा आधार घेऊन येथील ग्रामस्थ आपली तहान भागवित आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी गावाची लोकसंख्या ७०० पेक्षा अधिक आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतमजुरी असून, प्रामुख्याने बंजारा समाजातील लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वी सावरगाव येथून शासकीय योजना राबविण्यात येत होती; परंतु जवळपास १५ वर्षांपूर्वी ती योजनाही बंद पडली. त्यातच गावात हातपंप किंवा सार्वजनिक विहिरीसारखे कोणतेही जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना गावालगत असलेल्या किंवा शेतशिवारातील खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. तहान भागविण्यासाठी महिला मंडळी डोक्यावर हंडा घेऊन किलोमीटर पायपीट करतानाचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गावालगत लहानमोठे जलाशय किंवा तलाव असतानाही येथे शासकीय पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही किंवा लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा झाला नाही.

 गावात कोणतीही शासकीय पाणी पुरवठा योजना नाही किंवा हातपंपही नाही. त्यामुळे आम्हाला गावालगत असलेल्या किंवा शेतातील खाजगी विहिरीवरून पाणी आणून गरजा भागवाव्या लागत आहेत. येथे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.-संजय सातपुते, ग्रामस्थ साळंबी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी