शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; केवळ सात गावांमध्ये टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:46 IST

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे २६ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सरासरी ३० टक्के घट झाली. जिल्ह्यातील पैनगंगेवरील बॅरेजेसचा अपवाद वगळता इतर मध्यम व लघू असा एकही प्रकल्प या पावसामुळे तुडुंब भरलेला नव्हता. याशिवाय विहिरी, हातपंप, कूपनलिकांची पाणी पातळीही समाधानकारक वाढली नाही. त्यामुळे चालू वर्षी लवकरच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५१० गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून ५७८ उपाययोजना आखल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च महिन्यात होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चअखेर जिल्ह्यातील बाभूळगाव, काकडदाती (ता. वाशिम), उज्वलनगर, जनुना खुर्द, गलमगाव (ता. मानोरा) आणि गिर्डा, धोत्रा देशमुख (ता. कारंजा) या सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय २६ गावांमधील विहिरी आणि कुपनलिका अधिग्रहित करून त्याद्वारे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली, त्या गावांनी जिल्हा प्रशासनाकडे टँकर मागणी प्रस्ताव सादर करावे. पाणी उपलब्धता आणि विहीर अधिग्रहण प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधित गावांना विनाविलंब पाणीपुरवठा केला जाईल. प्रशासनाकडूनही अशा पाणीटंचाईग्रस्त गावांची चाचपणी सध्या केली जात आहे. - शैलेष हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम