शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; केवळ सात गावांमध्ये टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:46 IST

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे २६ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सरासरी ३० टक्के घट झाली. जिल्ह्यातील पैनगंगेवरील बॅरेजेसचा अपवाद वगळता इतर मध्यम व लघू असा एकही प्रकल्प या पावसामुळे तुडुंब भरलेला नव्हता. याशिवाय विहिरी, हातपंप, कूपनलिकांची पाणी पातळीही समाधानकारक वाढली नाही. त्यामुळे चालू वर्षी लवकरच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५१० गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून ५७८ उपाययोजना आखल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च महिन्यात होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चअखेर जिल्ह्यातील बाभूळगाव, काकडदाती (ता. वाशिम), उज्वलनगर, जनुना खुर्द, गलमगाव (ता. मानोरा) आणि गिर्डा, धोत्रा देशमुख (ता. कारंजा) या सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय २६ गावांमधील विहिरी आणि कुपनलिका अधिग्रहित करून त्याद्वारे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली, त्या गावांनी जिल्हा प्रशासनाकडे टँकर मागणी प्रस्ताव सादर करावे. पाणी उपलब्धता आणि विहीर अधिग्रहण प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधित गावांना विनाविलंब पाणीपुरवठा केला जाईल. प्रशासनाकडूनही अशा पाणीटंचाईग्रस्त गावांची चाचपणी सध्या केली जात आहे. - शैलेष हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम