शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:19 IST

११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अपुºया पावसामुळे ११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळेच अद्यापही अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीपूर्वी प्रामुख्याने विहिरी आणि गावतलावांचा पाण्यासाठी वापर होत असे. सिंचन प्रकल्पांची संख्या वाढत गेल्यानंतर विहिरी, गावतलावासारख्या पारंपरिक जलस्त्रोतांकडे दुर्लक्षही झाले. त्यामुळेच या जलस्त्रोतांची अवस्था गंभीर झाली असून, त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात खासगी आणि शासकीय मिळून एकूण ३४ हजार ६५५ विहिरी आहेत, तर गावतलावांची संख्याही हजाराच्या जवळपास आहे. गत काही वर्षांत या जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष झाल्याने बुजलेल्या जलस्त्रोतांची साठवण क्षमताच कमी झाली असताना पावसाचे प्रमाणही कमी होत गेल्याने या जलस्त्रोतांमुळे भुगर्भातील पाणी पातळी टिकविण्यासाठी होणारा आधारही कमी झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हे पारंपरिक जलस्त्रोत्र पूर्णपणे कोरडेच आहेत. विविध गावांतील गावतलावांची स्थिती गंभीर असल्याने आगामी काळात गुरांच्या पाण्याचा प्रश्न खुपच गंभीर होणार असून, विहिरी व कूपनलिकांची पातळीही वाढली नसल्याने जनतेलाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई