शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:06 IST

वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका रोपवाटिकांनाही बसत असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात वनविभागाच्या अखत्यारित २१ आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या १२ रोपवाटिका आहेत. त्यातील रोपांना दैनंदिन लाखो लीटर पाणी लागते. त्यानुषंगाने दोन्ही विभागांनी विहिरी, कुपनलिका, सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ही गरज भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील १३१ पैकी ३५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून अन्य प्रकल्पांची पाणीपातळीही कमालीची खालावली आहे. यामुळे धरणांमधून रोपे जगविण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्याचा थेट परिणाम आगामी वृक्ष लागवड मोहिमेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रोपवाटिकांमधील झाडांना लागणारे पाणी उपलब्ध न झाल्याने गतवर्षी अनेक रोपे अक्षरश: जळून गेली होती. तशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी काही रोपवाटिका धरण, तलावस्थळी हलविण्यात आल्या. त्यामुळे सद्यातरी पाण्याची गरज भागत आहे. मात्र, भविष्यात पाणी न मिळाल्यास रोपे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.- उत्तम फडसहायक वनसंरक्षकसामाजिक वनिकरण विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी