शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

१६ गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

कारंजा लाड : कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत ...

कारंजा लाड :

कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत पंचायत समितीकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

दरवर्षी कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाहाकार उडतो. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने व भारतीय जैन संघटनेने केलेली जलसंधारणाची कामे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे पाणीटंचाईची धग यंदा कमी प्रमाणात बघायला मिळत आहे.

कारंजा तालुक्यात एप्रिल महिन्याच्या १६ तारखेपासून पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. १४ पैकी १२ गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. यामध्ये बेंबळा, धामणी, कामरगाव, म्हसला, भामदेवी, सुकळी, जांब, भडशिवणी, अजमपूर, वापटी, वढवी, काजलेश्वर या गावांचा समावेश आहे. गिरडा व धोत्रा देशमुख या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ६ गावात विशेष नळ योजना दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये सुकळी, नारेगाव, कमठवाडा, खेर्डा कारंजा, भामदेवी, उंबर्डा बाजार या गावांचा समावेश आहे.

मागील वर्षी कारंजा तालुक्यात २२ गावे पाणीटंचाईच्या कक्षेत होते. मात्र यावर्षी पाणीटंचाईची धग कमी असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसून येत आहे.

००००००

कोट

कारंजा पंचायत समिती पाणीटंचाई बाबत दक्ष असून १२ गावांत विहीर अधिग्रहण केले तर २ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई समस्या नियंत्रणात आहे.

कालिदास तापी

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा