शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१६ गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

कारंजा लाड : कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत ...

कारंजा लाड :

कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत पंचायत समितीकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

दरवर्षी कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाहाकार उडतो. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने व भारतीय जैन संघटनेने केलेली जलसंधारणाची कामे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे पाणीटंचाईची धग यंदा कमी प्रमाणात बघायला मिळत आहे.

कारंजा तालुक्यात एप्रिल महिन्याच्या १६ तारखेपासून पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. १४ पैकी १२ गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. यामध्ये बेंबळा, धामणी, कामरगाव, म्हसला, भामदेवी, सुकळी, जांब, भडशिवणी, अजमपूर, वापटी, वढवी, काजलेश्वर या गावांचा समावेश आहे. गिरडा व धोत्रा देशमुख या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ६ गावात विशेष नळ योजना दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये सुकळी, नारेगाव, कमठवाडा, खेर्डा कारंजा, भामदेवी, उंबर्डा बाजार या गावांचा समावेश आहे.

मागील वर्षी कारंजा तालुक्यात २२ गावे पाणीटंचाईच्या कक्षेत होते. मात्र यावर्षी पाणीटंचाईची धग कमी असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसून येत आहे.

००००००

कोट

कारंजा पंचायत समिती पाणीटंचाई बाबत दक्ष असून १२ गावांत विहीर अधिग्रहण केले तर २ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई समस्या नियंत्रणात आहे.

कालिदास तापी

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा