शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:25 IST

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

ठळक मुद्दे१३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक.शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. 

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली असून ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. दरम्यान, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२८ लघु अशा १३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून तब्बल ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. १० ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या १९ प्रकल्पांचा समावेश असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठ्यासंदर्भात उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी