शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:25 IST

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

ठळक मुद्दे१३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक.शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. 

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली असून ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. दरम्यान, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२८ लघु अशा १३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून तब्बल ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. १० ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या १९ प्रकल्पांचा समावेश असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठ्यासंदर्भात उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी