शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईतच पाण्याचा अपव्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:17 IST

वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. लिकेज शोधून त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.सन २०१८ मध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा असतानाही काही प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत आहे. तसेच काही पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन व व्हॉल्वला लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या दाहकतेत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, दुसरीकडे मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.  शिरपूरनजीकच्या अडोळ प्रकल्पातून रिठद, शिरपूर, रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेंतर्गतच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांचे लक्ष कसे जात नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा राबविला जातो. सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाण्यासारखा पैसा योजनांवर ओतला जात आहे. तरीदेखील सर्वसामान्यांचा घसा कोरडाच राहत असल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचे कृती आराखड्यातून दिसून येते. पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी लिकेजची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई