शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईतच पाण्याचा अपव्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:17 IST

वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. लिकेज शोधून त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.सन २०१८ मध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा असतानाही काही प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत आहे. तसेच काही पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन व व्हॉल्वला लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या दाहकतेत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, दुसरीकडे मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.  शिरपूरनजीकच्या अडोळ प्रकल्पातून रिठद, शिरपूर, रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेंतर्गतच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांचे लक्ष कसे जात नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा राबविला जातो. सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाण्यासारखा पैसा योजनांवर ओतला जात आहे. तरीदेखील सर्वसामान्यांचा घसा कोरडाच राहत असल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचे कृती आराखड्यातून दिसून येते. पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी लिकेजची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई