शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

वाशिम:  कोकलगाव-एकबुर्जी जलवाहिनीचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:17 IST

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली.

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी आणण्याची तात्पुरती योजना मंजूर झाली असून, वाशिम नगर पालिकेच्यावतीने या योजनेच्या जलवाहिनीचे काम वेगात करण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटरचे खोदकामही पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

वाशिम शहरात गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यांत पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास १२ कोटी रुपयांच्या या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली; परंतु कोकलगाव बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तो विरोध वाढतच असल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर १२ दिवसांतच या योजनेच्या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटर अंतराचे खोदकामही पूर्ण झाले असून, २ किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे, तसेच पाणी खेचण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक त्या सुविधेचे कामही करण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच या योजनेचे काम पूर्ण होऊन वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरू होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी