शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाशिम:  कोकलगाव-एकबुर्जी जलवाहिनीचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:17 IST

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली.

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी आणण्याची तात्पुरती योजना मंजूर झाली असून, वाशिम नगर पालिकेच्यावतीने या योजनेच्या जलवाहिनीचे काम वेगात करण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटरचे खोदकामही पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

वाशिम शहरात गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यांत पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास १२ कोटी रुपयांच्या या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली; परंतु कोकलगाव बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तो विरोध वाढतच असल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर १२ दिवसांतच या योजनेच्या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटर अंतराचे खोदकामही पूर्ण झाले असून, २ किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे, तसेच पाणी खेचण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक त्या सुविधेचे कामही करण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच या योजनेचे काम पूर्ण होऊन वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरू होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी