शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

वाशिम : पाणीटंचाई निवारणासाठी चौसाळ्याचे ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 18:31 IST

 चौसाळा (वाशिम ): येत्या ४ मार्चपर्यंत पाणी पुरवठा न केल्यास कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा त्यांनी मानोरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देमानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पावरील १६ गावे पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो.दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपयांच्या मंजुरीनंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे चौसाळा येथे या योजनेतून होत असलेला पाणी पुरवठा बंद झाला असून, ग्रामस्थ शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करीत डोक्यावर पाणी आणून गरजा भागवित आहेत.

 चौसाळा (वाशिम ): प्रशासनाचा ढीसाळ नियोजनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा येथील पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे गावातील लोक २ किलोमीटर अंतरावरून पाणी आणून गरज भागवित असून, या प्रकाराला ते वैतागले आहेत. यामुळे येत्या ४ मार्चपर्यंत पाणी पुरवठा न केल्यास कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा त्यांनी मानोरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पावरील १६ गावे पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी ती फुटून पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. या पृष्ठभूमीवर गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपयांच्या मंजुरीनंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे चौसाळा येथे या योजनेतून होत असलेला पाणी पुरवठा बंद झाला असून, ग्रामस्थ शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करीत डोक्यावर पाणी आणून गरजा भागवित आहेत. या त्रासाबाबत अधिकाºयांना माहिती दिली आणि कंत्राटदाराकडेही काम लवकर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तथापि, त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी सुरू असलेल्या वणवण भटकंतीला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी याबाब मानोराच्या तहसीदारांकडे निवेदन सादर करीत येत्या ४ मार्चपर्यंत ही पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास ५ मार्च रोजी गावातील प्रत्येक व्यक्तींच्या सहभागाने कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून, यामुळे होणाºया परिणामास प्रशासन जबाबदारा राहणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी