शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

वाशिम : विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:10 IST

पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी सुरू केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २०१९ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने आतापासूनच काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी सुरू केली आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हिवाळ्यातच काही गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण केले जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आता टंचाईग्रस्त गावांत विहिर अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. एकूण ४०० विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी केल्या. अधिग्रहित विहिरीवरून संबंधित गावाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनातर्फे केला जाणार आहे. संबंधित गावात ज्या विहिरीत मुबलक जलसाठा आहे, अशी विहिर अधिग्रहित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. विहिर अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई