शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाशिम : विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:10 IST

पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी सुरू केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २०१९ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने आतापासूनच काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी सुरू केली आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हिवाळ्यातच काही गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण केले जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आता टंचाईग्रस्त गावांत विहिर अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. एकूण ४०० विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी केल्या. अधिग्रहित विहिरीवरून संबंधित गावाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनातर्फे केला जाणार आहे. संबंधित गावात ज्या विहिरीत मुबलक जलसाठा आहे, अशी विहिर अधिग्रहित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. विहिर अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई