शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम: पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:45 IST

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित तालुका कृषी विभागासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रारीही केल्या आहे. पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. त्या काळात झालेल्या पावसामुळे काही शेतात शेतकºयांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले; परंतु गत आठवडाभरात पेरणी केलेले बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. त्यात महाबीजसह इतर खासगी कंपन्या आणि घरगुती बियाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा या तीन तालुक्यांत हा प्रकार अधिक प्रमाणात घडला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत हा प्रकार घडला आहे. शेतकºयांनी या प्रकाराबाबत कृषी विभागासह महाबीजकडेही तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत १ लाख १४ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रात अर्थात ५३ टक्के पेरणी उरकली असून, यात १ लाख ६० हजार ९२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचेच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती मागविली आहे.

दुबार पेरणीतही समस्या उद्भवण्याची भीती गतवर्षीच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदाच्या हंगामात शेतकºयांनी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यानंतरही बियाणे न उगवल्याचा प्रकार घडला आहे. यावरून यंदाच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमताच खालावल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन पिकाचीच दुबार पेरणी केल्यास बियाणे न उगवण्याची समस्या पुन्हा उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीनची दुबार पेरणी करावी की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक शेतकºयांकडून सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांना पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले असून, या प्रकाराची पाहणी होईल.- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी