शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

वाशिम: पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:45 IST

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित तालुका कृषी विभागासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रारीही केल्या आहे. पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. त्या काळात झालेल्या पावसामुळे काही शेतात शेतकºयांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले; परंतु गत आठवडाभरात पेरणी केलेले बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. त्यात महाबीजसह इतर खासगी कंपन्या आणि घरगुती बियाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा या तीन तालुक्यांत हा प्रकार अधिक प्रमाणात घडला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत हा प्रकार घडला आहे. शेतकºयांनी या प्रकाराबाबत कृषी विभागासह महाबीजकडेही तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत १ लाख १४ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रात अर्थात ५३ टक्के पेरणी उरकली असून, यात १ लाख ६० हजार ९२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचेच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती मागविली आहे.

दुबार पेरणीतही समस्या उद्भवण्याची भीती गतवर्षीच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदाच्या हंगामात शेतकºयांनी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यानंतरही बियाणे न उगवल्याचा प्रकार घडला आहे. यावरून यंदाच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमताच खालावल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन पिकाचीच दुबार पेरणी केल्यास बियाणे न उगवण्याची समस्या पुन्हा उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीनची दुबार पेरणी करावी की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक शेतकºयांकडून सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांना पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले असून, या प्रकाराची पाहणी होईल.- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी