शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Washim: पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By सुनील काकडे | Updated: September 4, 2023 18:59 IST

Poharadevi: पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

- सुनील काकडेवाशिम - बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून जगविख्यात जिल्ह्यातील पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सततच्या पाठपुराव्यास यामुळे यश आल्याची माहिती गोपाल महाराज यांनी ४ सप्टेंबर रोजी दिली.

पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज आणि श्री जगदंबा मातेचे मंदिर वसलेले आहे. त्याचे व्यवस्थापन श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट, पोहरादेवी या नावाने असलेल्या न्यासामार्फत चालविले जाते. संत सेवादास महाराजांनी देवीचे मंदीर बांधले असून त्यांच्याच कुटुंबातील रतनसिंग महाराज, धनुसिंग महाराजांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात आलासिंग रतनसिंग महाराज आणि हंजारी धनुसिंग महाराजांची विश्वस्त म्हणून नेमणुक झाली.सन १९५३-५४ च्या दरम्यान एका निकालानुसार आलासिंग महाराज आणि हंजारी महाराज या दोन शाखांना वंशपरंपरेने प्रत्येकी एका वर्षासाठी मंदिर व्यवस्थापनाचे अधिकार मिळाले. १२ नोव्हेंबर २०१४ पासून मात्र सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने एक योजना आणि कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. ती योजना आणि विश्वस्त मंडळाविरोधात अनेक वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर २२ ऑगस्ट २०२३ रोजी सदर योजना आणि विश्वस्तमंडळ सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये रद्द केले.

या प्रकरणी विद्यमान न्यासाविरोधात संत रामराव महाराज, गोपाल महाराज, रमेश महाराज, संजय महाराज, सिताराम पवार आणि माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायालय (लिंक कोर्ट), मंगरूळपीर ते सर्वोच्च न्यायालय, दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. त्यास अखेर यश मिळाले असून सहायक धर्मादाय आयुक्तांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील तरतुदीनुसार चौकशी करूनच नवे विश्वस्तमंडळ आणि नव्या योजनेला मंजुरी द्यावयाची आहे, असे निर्णयात नमूद आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बंजारा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारा आहे. जुनी आणि नवी योजना न्यायालयाने रद्द केल्याने कोणाही एका गटाचा आता मंदिर व्यवस्थापनावर हक्क राहिलेला नाही. दोन्हीही गटांना समान अधिकार सर्वोच्च न्यायालयाने नविन विश्वस्त मंडळ येईपर्यंत प्रदान केले आहे.- गोपाल महाराज, पोहरादेवी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, त्याचा वेगळा अर्थ कुणी लावू नये. आता सहायक धर्मादाय आयुक्त कशाप्रकारे विश्वस्त मंडळ गठीत करतात, याप्रकरणी नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, त्याची प्रतीक्षा आहे.- महंत कबीरदास महाराज, पोहरादेवी

टॅग्स :washimवाशिमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय