शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:17 IST

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले.या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे.

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असून, जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी पाणी सोडण्यात येत असल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जिल्ह्यात आधीच पाणीटंचाई असताना संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी मैलाची भटकंती करीत आहेत. 

अडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्यावतीने या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले; परंतु गेल्या ३ महिन्यांपासून केवळ इंझोरी येथील कामच अद्याप पूर्ण झाले नसून, या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे. सतत सोडण्यात येत असलेल्या या पाण्यामुळे गावातील रस्ते जलयम होत असून, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. अडाण प्रकल्पाची पातळी आधीच खालावली असल्याने या प्रकल्पावरील शेतकºयांच्या जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जनतेला करण्यात आले आहे. दुसरीकडे केवळ जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या नावाखाली लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने ग्रामस्थ मैलभर पायदळ जात शेतामधून पाणी आणून आपल्या गरजा भागवित असताना जीवन प्राधीकरण मात्र त्याची दखल घेत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाºयांसह कंत्राटदारांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी