शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

वाशिम : जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:17 IST

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले.या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे.

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असून, जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी पाणी सोडण्यात येत असल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जिल्ह्यात आधीच पाणीटंचाई असताना संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी मैलाची भटकंती करीत आहेत. 

अडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्यावतीने या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले; परंतु गेल्या ३ महिन्यांपासून केवळ इंझोरी येथील कामच अद्याप पूर्ण झाले नसून, या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे. सतत सोडण्यात येत असलेल्या या पाण्यामुळे गावातील रस्ते जलयम होत असून, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. अडाण प्रकल्पाची पातळी आधीच खालावली असल्याने या प्रकल्पावरील शेतकºयांच्या जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जनतेला करण्यात आले आहे. दुसरीकडे केवळ जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या नावाखाली लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने ग्रामस्थ मैलभर पायदळ जात शेतामधून पाणी आणून आपल्या गरजा भागवित असताना जीवन प्राधीकरण मात्र त्याची दखल घेत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाºयांसह कंत्राटदारांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी