शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाशिम : जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:17 IST

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले.या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे.

इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असून, जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी पाणी सोडण्यात येत असल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जिल्ह्यात आधीच पाणीटंचाई असताना संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी मैलाची भटकंती करीत आहेत. 

अडाण प्रकल्पावरून १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्यावतीने या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि तीन महिन्यांपूर्वी या योजनेची जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मजीप्राच्यावतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले; परंतु गेल्या ३ महिन्यांपासून केवळ इंझोरी येथील कामच अद्याप पूर्ण झाले नसून, या ठिकाणी जलवाहिनीतील लिकेज शोधण्यासाठी दरदिवशी हजारो लीटर पाणी सोडण्यात येत आहे. सतत सोडण्यात येत असलेल्या या पाण्यामुळे गावातील रस्ते जलयम होत असून, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. अडाण प्रकल्पाची पातळी आधीच खालावली असल्याने या प्रकल्पावरील शेतकºयांच्या जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जनतेला करण्यात आले आहे. दुसरीकडे केवळ जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या नावाखाली लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने ग्रामस्थ मैलभर पायदळ जात शेतामधून पाणी आणून आपल्या गरजा भागवित असताना जीवन प्राधीकरण मात्र त्याची दखल घेत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाºयांसह कंत्राटदारांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी