शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : रिसोड तालुक्यातील मसलापेन बॅरेजचा प्रश्न मार्गी लागणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:01 IST

रिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ठळक मुद्देलखनसिंह ठाकूर यांचा पाठपुरावा शेतक-यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या बॅरेजसंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा केला.रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा परिसरातून गेलेल्या पैनगंगा नदीवर बॅरेज निर्माण झाले तर याचा फायदा शेकडो शेतक-यांना होऊ शकतो, हा मुद्दा उचलून धरत लखनसिंह ठाकूर यांनी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. मध्यंतरी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने ठाकूर यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चाही झाली होती. या चर्चेत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील विलंब दूर झाला होता. १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील आढावा बैठकीत यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी मार्च २०१८ अखेरपर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करुन जून २०१९ पर्यंत हा प्रश्न संपूर्णपणे निकाली काढला जाईल असे सांगितले. बॅरेजचा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही पाठपुरावा सुरूच ठेवू, असे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी