शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

वाशिम : रिसोड तालुक्यातील मसलापेन बॅरेजचा प्रश्न मार्गी लागणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:01 IST

रिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ठळक मुद्देलखनसिंह ठाकूर यांचा पाठपुरावा शेतक-यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या बॅरेजसंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा केला.रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा परिसरातून गेलेल्या पैनगंगा नदीवर बॅरेज निर्माण झाले तर याचा फायदा शेकडो शेतक-यांना होऊ शकतो, हा मुद्दा उचलून धरत लखनसिंह ठाकूर यांनी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. मध्यंतरी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने ठाकूर यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चाही झाली होती. या चर्चेत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील विलंब दूर झाला होता. १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील आढावा बैठकीत यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी मार्च २०१८ अखेरपर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करुन जून २०१९ पर्यंत हा प्रश्न संपूर्णपणे निकाली काढला जाईल असे सांगितले. बॅरेजचा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही पाठपुरावा सुरूच ठेवू, असे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी