शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

वाशिम : शेकडो हेक्टरवरील पिके उदध्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 14:11 IST

शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने शेतकºयांवर जणू आभाळच कोसळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. आता २७ व २८ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने शेतकºयांवर जणू आभाळच कोसळले आहे. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, काजळांबा, सावळी, तांदळी, अडोळी, अनसिंग, तोंडगाव यासह मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील रहिवासी व नदि काठावरील मारसुळ शिवारात शेतजमीन असलेले इंदल पुरुषोत्तम, गोकुल पुरुषोत्तम, देवलाल पुरुषोत्तम, गोपाल पुरुषोत्तम यासह अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यात शेतात झाकुण ठेवलेल्या सोयाबीन सुड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. तूर पीकही खरडून गेले. सावळी येथील कपाशी पीक खरडून गेले.जिल्हयात झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागणार आहे. याबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करावी तसेच नमुना अर्ज द्यावा असे निर्देश कृषी विभागाच्यावतिने देण्यात आले. आहे. शेतकºयांनी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

सरपंच संघटना आक्रमकसंततधार व अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन भरपाई जाहीर करण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली असून ३० आॅक्टोबर रोजी तहसीलारांची भेट घेणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील लुंगे यांनी केले आहे.

पीक नुकसानाचे वैयक्तिक पंचनामे होणारपावसामुळे उभ्या पिकांचे तसेच काढणी पश्चात तयार न झालेल्या पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक शेतकºयांचे पंचनामे करावे, सोबत पीक नुकसानाचा सूचना फॉर्म भरून ४८ तासांच्या आत प्रधानमंत्री पीक विमा योजना काढलेल्या शेतकºयांनी विमा कंपनीच्या मेल आयडीवर पाठवण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी आधीच दिले आहेत. दरम्यान याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकºयांना मदत मिळावी याकरिता कृषी विभागाच्यावतिने तातडीने पंचनामे करावे लागणार असून तशी व्यवस्था कृषी विभागाच्यावतिने केली जाणारा आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावर यांनी कळविले.

नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करा - राजेंद्र पाटणीवाशिम : जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करावे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. शेतकºयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने यापूर्वी तत्काळ मदत केली आहे. सध्या जिल्ह्यात विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, अशा सूचना आमदार पाटणी यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी