शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

वाशिम : सिंचनासाठी पाणी मिळेना; शेतक-यांचा टाहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:21 IST

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

ठळक मुद्देइंझोरी परिसरातील शेतकरी हवालदिलसोनल प्रकल्पातूनही सिंचनासाठी पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

यावर्षी अल्प पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून प्रशासनाने प्रकल्पांतील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, सदर निर्देश पेरणी पूर्ण झाल्यानंतर दिल्याने, प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना आता या निर्देशाचा जबर फटका बसत आहे. पेरणी करताना, प्रकल्पातून पाणी मिळणार नाही, असे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळेल, या आशेने शेकडो शेतकºयांनी गहू, हरभरा व अन्य पिके घेतली आहेत. मात्र, आता प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे बंद झाला. रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने प्रकल्प परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंपाच्या जोडण्या खंडीत केल्या. सोनल प्रकल्पातून दरवर्षी जवळपास ८०० हेक्टरपेक्षा अधिक जमिन सिंचनाखाली येते. यावर्षी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकºयांची समस्या वाढली आहे. मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने इंझोरी परिसरातील पिके पाण्याअभावी कोमेजण्याची शक्यता आहे. शेतकºयांचा प्रखर विरोध असतानाही, इंझोरी परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंप जोडण्या प्रशासनाने खंडित केल्या. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न गहन बनला आहे. अडाण धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी इंझोरी परिसरातील शेतकºयांचा लढा सुरू आहे. मात्र, अद्याप कृषीपंप जोडण्या पूर्ववत झाल्या नाहीत. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी