शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

वाशिम : सिंचनासाठी पाणी मिळेना; शेतक-यांचा टाहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:21 IST

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

ठळक मुद्देइंझोरी परिसरातील शेतकरी हवालदिलसोनल प्रकल्पातूनही सिंचनासाठी पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे.

यावर्षी अल्प पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून प्रशासनाने प्रकल्पांतील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, सदर निर्देश पेरणी पूर्ण झाल्यानंतर दिल्याने, प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर असलेल्या शेतकºयांना आता या निर्देशाचा जबर फटका बसत आहे. पेरणी करताना, प्रकल्पातून पाणी मिळणार नाही, असे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळेल, या आशेने शेकडो शेतकºयांनी गहू, हरभरा व अन्य पिके घेतली आहेत. मात्र, आता प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे बंद झाला. रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने प्रकल्प परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंपाच्या जोडण्या खंडीत केल्या. सोनल प्रकल्पातून दरवर्षी जवळपास ८०० हेक्टरपेक्षा अधिक जमिन सिंचनाखाली येते. यावर्षी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकºयांची समस्या वाढली आहे. मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्याने इंझोरी परिसरातील पिके पाण्याअभावी कोमेजण्याची शक्यता आहे. शेतकºयांचा प्रखर विरोध असतानाही, इंझोरी परिसरातील शेतकºयांच्या कृषीपंप जोडण्या प्रशासनाने खंडित केल्या. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न गहन बनला आहे. अडाण धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी इंझोरी परिसरातील शेतकºयांचा लढा सुरू आहे. मात्र, अद्याप कृषीपंप जोडण्या पूर्ववत झाल्या नाहीत. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी