शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वाशिम : बाजारपेठ घाणीने; रस्ते माखले चिखलाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:56 IST

वाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देबाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार, २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्यास वाशिम जिल्हा देखील अपवाद नाही. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांना शहरांतर्गत स्वच्छता राखण्याकामी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी देखील मिळाला. प्रत्यक्षात मात्र आजघडिला अभियानाचा कुठलाच उद्देश सफल झाला नसल्याचे ठायीठायी निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांतर्गत उघड्यावरील शौचविधीस कायमचे बंद करणे, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करणे, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, आदी घटकांवर काम होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांनी शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशांनाच हरताळ फासला आहे. सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांची स्वच्छता, तुलनेने अधिक खराब झालेल्या रस्त्यांचे नुतनीकरण; तर काही प्रमाणात खराब झालेल्या रस्त्यांची डागडूजी, यासारखी मान्सूनपुर्व कामे एकाही नगर परिषद कार्यक्षेत्रात झाली नाहीत. परिणामी, सद्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान