शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वाशिम : बाजारपेठ घाणीने; रस्ते माखले चिखलाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:56 IST

वाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देबाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार, २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्यास वाशिम जिल्हा देखील अपवाद नाही. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांना शहरांतर्गत स्वच्छता राखण्याकामी शासनस्तरावरून लाखो रुपयांचा निधी देखील मिळाला. प्रत्यक्षात मात्र आजघडिला अभियानाचा कुठलाच उद्देश सफल झाला नसल्याचे ठायीठायी निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठा घाणीने; तर रस्ते चिखलाने माखले असून त्यात मुख्य रस्त्यांवरील खड्डे देखील भर घालत आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या (नागरी) मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांतर्गत उघड्यावरील शौचविधीस कायमचे बंद करणे, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करणे, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, आदी घटकांवर काम होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांनी शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशांनाच हरताळ फासला आहे. सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांची स्वच्छता, तुलनेने अधिक खराब झालेल्या रस्त्यांचे नुतनीकरण; तर काही प्रमाणात खराब झालेल्या रस्त्यांची डागडूजी, यासारखी मान्सूनपुर्व कामे एकाही नगर परिषद कार्यक्षेत्रात झाली नाहीत. परिणामी, सद्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आठवडी बाजारासह अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर सर्वत्र चिखल साचत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत असून प्रशासनाच्या कार्यशून्यतेप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान