शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

वाशिम : ‘सोशल डिस्टन्सिंग’चा सर्वत्र फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:10 AM

‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जात नसल्याचे १ एप्रिल रोजी शिरपूरसह ग्रामीण भागात दिसून आले.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर १७ मार्चपासून शाळा बंद असून, या शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य संबंधित विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून दिले जात आहे. दरम्यान धान्य घेण्यासाठी पालकांची शाळा परिसरात गर्दी होत असून, येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जात नसल्याचे १ एप्रिल रोजी शिरपूरसह ग्रामीण भागात दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक घटकाकडून दक्षता घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना १७ मार्चपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार पुरविला जातो. परंतू, शाळा बंद असल्याने आणि आता उन्हाळ्या्च्या सुट्टयाही लागणार असल्याने पोषण आहार योजनेंतर्गतचे उपलब्ध तांदूळ व अन्य धान्य संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाने २६ मार्च रोजी दिले. या आदेशानुसार धान्य घेऊन जाण्याच्या सूचना पालकांना दिल्या. धान्य घेताना गर्दी होत असल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ फासला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा; विद्यार्थिही उपस्थितशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ आणि खासगी अनुदानित १५० अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून धान्य दिले जात आहे. धान्याचे वितरण करताना गर्दी होऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगवून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतू, अनेक शाळा परिसरात विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले नसल्याने तसेच दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर राखण्याची दक्षताही घेतली जात नसल्याने गर्दी होत असल्याचे चित्र शाळा परिसरात दिसून येते. विशेष म्हणजे काही पालक हे आपल्या पाल्यालादेखील शाळा परिसरात आणत असल्याचे १ एप्रिल रोजी दिसून आले.

शिरपूर येथे पालकांची गर्दीच्पोषण आहाराचा शिल्लक असलेला तांदूळ वरिष्ठांच्या सूचनेनंतर शिरपूर येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेमध्ये १ एप्रिल रोजी वाटप करण्यात आला.च्कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. विशिष्ट अंतर राखून नागरिकांनी सुरक्षितता राखावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. तथापि, या सुचनांचे पालन १ एप्रिल रोजी जि.प. कन्या मराठी शाळेत झाले नसल्याचे दिसून आले. तांदूळ घेण्यासाठी शाळेतील मुलींसह त्यांचे पालक मोठ्या संख्येत गर्दी करून हजर होते. तांदूळ वाटपासाठी वर्तुळे आखण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य वाटप करताना विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करून गर्दी करू नये.- अंबादास मानकर शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा