शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

वाशिम : ‘सोशल डिस्टन्सिंग’चा सर्वत्र फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 09:10 IST

‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जात नसल्याचे १ एप्रिल रोजी शिरपूरसह ग्रामीण भागात दिसून आले.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर १७ मार्चपासून शाळा बंद असून, या शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य संबंधित विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून दिले जात आहे. दरम्यान धान्य घेण्यासाठी पालकांची शाळा परिसरात गर्दी होत असून, येथे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जात नसल्याचे १ एप्रिल रोजी शिरपूरसह ग्रामीण भागात दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक घटकाकडून दक्षता घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना १७ मार्चपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार पुरविला जातो. परंतू, शाळा बंद असल्याने आणि आता उन्हाळ्या्च्या सुट्टयाही लागणार असल्याने पोषण आहार योजनेंतर्गतचे उपलब्ध तांदूळ व अन्य धान्य संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाने २६ मार्च रोजी दिले. या आदेशानुसार धान्य घेऊन जाण्याच्या सूचना पालकांना दिल्या. धान्य घेताना गर्दी होत असल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ फासला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा; विद्यार्थिही उपस्थितशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ आणि खासगी अनुदानित १५० अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना ३० मार्चपासून धान्य दिले जात आहे. धान्याचे वितरण करताना गर्दी होऊ नये म्हणून विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगवून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतू, अनेक शाळा परिसरात विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविले नसल्याने तसेच दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर राखण्याची दक्षताही घेतली जात नसल्याने गर्दी होत असल्याचे चित्र शाळा परिसरात दिसून येते. विशेष म्हणजे काही पालक हे आपल्या पाल्यालादेखील शाळा परिसरात आणत असल्याचे १ एप्रिल रोजी दिसून आले.

शिरपूर येथे पालकांची गर्दीच्पोषण आहाराचा शिल्लक असलेला तांदूळ वरिष्ठांच्या सूचनेनंतर शिरपूर येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेमध्ये १ एप्रिल रोजी वाटप करण्यात आला.च्कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. विशिष्ट अंतर राखून नागरिकांनी सुरक्षितता राखावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. तथापि, या सुचनांचे पालन १ एप्रिल रोजी जि.प. कन्या मराठी शाळेत झाले नसल्याचे दिसून आले. तांदूळ घेण्यासाठी शाळेतील मुलींसह त्यांचे पालक मोठ्या संख्येत गर्दी करून हजर होते. तांदूळ वाटपासाठी वर्तुळे आखण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचे धान्य वाटप करताना विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करून गर्दी करू नये.- अंबादास मानकर शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा