शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावाधाव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:14 IST

शेतकºयांनी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर अर्ज सादर करण्याची एकच घाई केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर मंगळवारी पिक नुकसानापोटी पिकविमा कंपनीकडून आर्थिक भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांनी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर अर्ज सादर करण्याची एकच घाई केली आहे. जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे आधीच नुकसान झाले, तर गत दोन दिवसांत आलेल्या जोरदार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशी आणि तूर या खरीप पिकांसह फळबागा आणि कापणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पावसामुळे कपाशीच्या पिकाची बोंडे गळून पडली, तर फुटलेल्या बोंडातील कापूसही ओला झाला. त्याशिवाय फुलावर येत असलेल्या तुरीच्या पिकालाही पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तुरीचे पिक जमीनदोस्त झाले. पपई, लिंबू, डाळींब या फळपिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता ज्या शेतकºयांनी पिक विमा योनेत सहभाग घेतला. त्या शेतकºयांच्या शेतातील नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाकडून मंगळवारी सुरू करण्यात आली.   पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी पिकांच्या नुकसानाची तक्रार ४८ तासांच्या आत करावी लागणार असून, शेतकºयांना संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी, ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेत अथवा संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, पीक विमा भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी प्रशासनाकडून निश्चित केलेल्या केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह धावाधाव सुरू केल्याचे मंगळवारी दिसले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे वैयक्तिक पंचनाम्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार असून, या प्रक्रियेतंर्गत मंगळवारपासून जिल्ह्यात पिक नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकांनी सुरू केली आहे. त्याशिवाय पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी  पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 पंचनाम्याचे निकष जाचकपावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच भागातील तूर, कपाशी या उभ्या पिकांचे तसेच सुड्या लावून ठेवलेल्या आणि कापणी करून शेतात सुकण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने जिल्ह्यात नुकासानाची पाहणी सुरू केली आहे. तथापि, ज्या भागात संबंधित दिवशी ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडलेल्या भागात पंचनामे करण्याचे शासनाचे निकष आहेत. त्यातच पिक विमा काढलेल्या शेतकºयांना मदत मिळेल; परंतु पिक विमा न काढलेल्या शेतकºयांचे काय, हा प्रश्न आहे.  

जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, शासनाच्या निकषानुसार संबंधित विभागने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. याचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठविण्यात येईल.-शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी पिकविमा काढला आहे. त्या शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांसह पिकविमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकाकडे अर्ज सादर करावा, तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा.- शंकर तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagricultureशेती