शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:05 IST

वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या सहाही तालुक्यांतील जवळपास सव्वा लाख थकबाकीदार शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात सत्तारूढ झालेल्या नवीन सरकारकडून सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सव्वा लाखावर शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारकडून केव्हा जाहिर होतो, याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे या निर्णयाच्या शक्यतेमुळे थकबाकीदार शेतकºयांच्या माहितीची जुळवाजूळव प्रशासनाकडून केली जात आहे.मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने जून २०१७ या महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही.२०१९ मध्ये सत्तांतर झाल्याने संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नाने जोर पकडला. २८ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले असून, सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकºयांना तातडीने कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या सहाही तालुक्यांतील जवळपास सव्वा लाख थकबाकीदार शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे.किमान समान कार्यक्रमानुसार शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यास जिल्ह्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे त्यामुळे जिल्हयातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा अग्रणी बँक तसेच उपनिबंधक कार्यालयातर्फे पीककर्जाची उचल करणाºया जिल्ह्यातील संपूर्ण शेतकºयांची माहिती संकलित केली जात आहे.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय नवीन सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी