शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:25 IST

वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

ठळक मुद्देसन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. निकषात बदल असल्याचे कारण समोर करून अद्याप वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. येत्या १०-१५ दिवसाच्या आत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास  आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला.

वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

गतवर्षी वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली. प्रकल्पांतदेखील पुरेशा प्रमाणात जलसाठा नसल्याने शेतकºयांना सिंचन करता आले नाही. आताही रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची बिकट अवस्था असून, शासनाने शेतकºयांना दिलासा देणे अपेक्षीत आहे.   सन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. मात्र, निकषात बदल असल्याचे कारण समोर करून अद्याप वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. हा एकप्रकारे शेतकरी व शेतकरी पुत्रांवर अन्याय असल्याचा आरोप करीत वाशिम जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शासनाकडे केली. 

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नसल्याने शासनाकडून मिळणाºया सवलतींपासून शेतकºयांना तुर्तास तरी वंचित राहावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना वीज देयकात सुट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सुट, शेतसारा भरण्याला सुट यासह अन्य सवलती मिळतात. शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी राकाँच्यावतीने करण्यात आली. खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे असतानाही, दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषणा करण्याला विलंब लागत आहे. येत्या १०-१५ दिवसाच्या आत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास  आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमNCPराष्ट्रवादी काँग्रेसcollectorतहसीलदार