शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वाशिम जिल्ह्यात  दोन वर्षात पूर्ण झाले केवळ ७५२ शेततळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:12 IST

वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते.शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. दरम्यान, इच्छुक शेतकºयांनी ‘आॅनलाईन’ अर्ज सादर करून योजनेत सहभागी होण्याचे आवाहन पुन्हा एकवेळ गुरूवारी करण्यात आले आहे. शेतमाल उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी  शासनाने पुर्वी राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची मोडतोड करून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी किचकट अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार, टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील ५ वर्षात किमान एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली, अशा गावांमध्ये शेततळे घेण्यास मान्यता देण्यात आली. योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली असून सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटरचे असून त्यासाठी केवळ ५० हजार रुपये कमाल अनुदान दिले जात आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. एकूणच या सर्व अटींमुळे शेतकºयांकडून मागेल त्याला शेततळे योजनेस प्रतिसाद मिळणे अशक्य ठरत आहे. पर्यायाने दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून ज्या शेतकºयांना शेततळे घेण्याची इच्छा आहे, त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास कृषी सहायक, मंडळ अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी