शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

वाशिम जिल्हा तापाने फणफणला!

By admin | Updated: September 16, 2014 18:47 IST

साथीच्या आजाराने डोके वर तर काढलेच शिवाय अज्ञात आजाराने संपूर्ण जिल्हा फणफणल्याचे चित्र जिल्हय़ातील खासगी व शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येते.

वाशिम : जिल्हय़ात साथीच्या आजाराने डोके वर तर काढलेच शिवाय अज्ञात आजाराने संपूर्ण जिल्हा फणफणल्याचे चित्र जिल्हय़ातील खासगी व शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येते. वाशिम शहरातील काही दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी जागाच नसल्याने त्यांना भरती न करताच उपचार करून पाठवून दिल्या जात आहे. मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात अचानक रुग्णसंख्येत वाढ होऊन दररोज पाचशेच्यावर, तर रिसोड येथे एक हजाराच्यावर रुग्णांवर तपासणी केल्या जात आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून, नोंदणीकरिता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठय़ा प्रमाणात गर्दी आहे. काही दिवसांआधी वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत असल्याने रुग्णालयात गर्दी वाढल्याचे आरोग्य विभागाने कळविले होते; मात्र सध्या साथीच्या आजारासह अज्ञात आजाराने डोके वर काढले असून, थंडी ताप, व पेशी होण्याच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. बालकांची आरोग्य प्रतिकार क्षमता कमी असल्याने सर्वाधिक रुग्ण बालक दिसून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केल्या जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण साथीचे आजाराचे दिसून येत आहेत. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सूज येणे या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत. तसेच धूरफवारणी प्रकारच जिल्हय़ात होत नसल्याने यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. यामुळे मेंदूचा हिवताप, उलट्या, नाक व तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे रक्तादाब कमी होणे यासारखे आजार कमी प्रमाणात दिसून येत असले तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात धूरफवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघड्यावरील तळलेले पदार्थ टाळावे, रेफ्रीजेटरमधील खाद्य पदार्थ टाळावे, हवेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो सकाळी घरीच थांबावे. अस्थमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी या दिवसाची घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांसह योगा व श्‍वसननाचा व्यायाम करावा आणि पाणी शुद्ध करून जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डेंगी ताप, मलेरिया, डायरिया, सर्दी, ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फिवर, डेंगी शॉक, सिड्रोम या आजाराची लागण होऊ शकते. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून फाँगिग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून सदर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या दिवसात सर्वात जास्त आजाराचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्‍या लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला व तापाच्या आजारानी ग्रासले आहे. बालकांना श्‍वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयांसह शहरातील बाल रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हय़ातील सर्वच दवाखाने हाऊसफुल असल्याने व ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे.