शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

दुष्काळी सवलतीच्या लाभापासून वाशिम जिल्हावासी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:45 IST

वाशिम : सन २०१७-१८ या वर्षात जिल्हयातील ७७४ गावांत खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने विविध स्वरुपातील ८ प्रकारच्या दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. तीन सवलतींचा अपवाद वगळता उर्वरीत पाच सवलतींचा लाभ जिल्हावासियांना अद्याप मिळाला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१७-१८ या वर्षात जिल्हयातील ७७४ गावांत खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने विविध स्वरुपातील ८ प्रकारच्या दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. तीन सवलतींचा अपवाद वगळता उर्वरीत पाच सवलतींचा लाभ जिल्हावासियांना अद्याप मिळाला नाही. गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या सुमारे ३० ते ३५ टक्के पाऊस कमी झाला. विविध प्रकारच्या प्रतिकुल बाबींमुळे शेतमाल उत्पादनात प्रचंड घट आली होती. जिल्हा प्रशासनाने विहित निकषांच्या आधारे जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७७४ महसूल गावांची अंतीम पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली होती.  यामुळे राज्य शासनातर्फे वाशिम तालुक्यातील १३१, मालेगाव १२२, रिसोड १००, मंगरूळपीर ११८, कारंजा १६७ आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांंमध्ये विविध स्वरूपातील सवलती घोषित करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या ७७४ महसूली गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज खंडित न करणे, अशा एकंदरित ८ उपाययोजनांचा समावेश होता. यापैकी सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या, रोहयोच्या कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या तसेच टंचाईग्रस्त काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, जमिन महसुलात सुट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत न करणे या प्रमुख सवलतींचा लाभ ७७४ महसूल गावांतील नागरिकांना अद्याप मिळाला नाही. दुष्काळी सवलतींचा लाभ कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करून शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळ