शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दुष्काळी सवलतीच्या लाभापासून वाशिम जिल्हावासी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:45 IST

वाशिम : सन २०१७-१८ या वर्षात जिल्हयातील ७७४ गावांत खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने विविध स्वरुपातील ८ प्रकारच्या दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. तीन सवलतींचा अपवाद वगळता उर्वरीत पाच सवलतींचा लाभ जिल्हावासियांना अद्याप मिळाला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१७-१८ या वर्षात जिल्हयातील ७७४ गावांत खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने विविध स्वरुपातील ८ प्रकारच्या दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. तीन सवलतींचा अपवाद वगळता उर्वरीत पाच सवलतींचा लाभ जिल्हावासियांना अद्याप मिळाला नाही. गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या सुमारे ३० ते ३५ टक्के पाऊस कमी झाला. विविध प्रकारच्या प्रतिकुल बाबींमुळे शेतमाल उत्पादनात प्रचंड घट आली होती. जिल्हा प्रशासनाने विहित निकषांच्या आधारे जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७७४ महसूल गावांची अंतीम पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली होती.  यामुळे राज्य शासनातर्फे वाशिम तालुक्यातील १३१, मालेगाव १२२, रिसोड १००, मंगरूळपीर ११८, कारंजा १६७ आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांंमध्ये विविध स्वरूपातील सवलती घोषित करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या ७७४ महसूली गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज खंडित न करणे, अशा एकंदरित ८ उपाययोजनांचा समावेश होता. यापैकी सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या, रोहयोच्या कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या तसेच टंचाईग्रस्त काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, कृषिपंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, जमिन महसुलात सुट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत न करणे या प्रमुख सवलतींचा लाभ ७७४ महसूल गावांतील नागरिकांना अद्याप मिळाला नाही. दुष्काळी सवलतींचा लाभ कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करून शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळ