शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

वाशिम : बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील ६५० विहिरींची कामं ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 10:54 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वाशिम - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मागील आर्थिक वर्ष सन २०१६-१७ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतक-यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ७०० नवीन सिंचन विहीरी मंजूर झाल्या होत्या. मे २०१७ या महिन्यात लाभार्थींची निवड करण्यात आली आणि विहिरींची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३० जून २०१७ अशी ठेवण्यात आली. एका महिन्याच्या कालावधीत विहिरींची कामे शक्य नसल्याने केवळ ५० शेतक-यांनी या नियमाची पुर्तता केली तर उर्वरीत शेतक-यांची कामे अपूर्ण राहिली. 

एका विहिरीसाठी व सिंचन साहित्यासाठी साधारणत: दोन लाख ७० हजार रुपयांचा निधी अनुदान स्वरुपात मिळतो. जवळपास ६५० विहिरींची कामे अपूर्ण असल्याने १७.५५ कोटींचा निधी पडून आहे. या लाभार्थींना सिंचन विहिरीचा लाभ मिळाला नाही. या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ पुढील आर्थिक  वर्षात मिळावा यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने ३ ऑगस्ट २०१७ च्या पत्रानुसार मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्या प्रस्तावाचा विचार करून २८ सप्टेंबर २०१७ रोजी  सदर विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात यावी आणि सदर अधिकार जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे सदरचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त होवून दोन महिन्याचा कालावधी लोटला. तथापि, अद्यापपर्यंत मुदतवाढ देण्याची कोणतीही कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून झालेली नाही. मुदतवाढीनुसार, अपूर्ण विहिरींची कामे पुर्ण करण्यासाठी केवळ चार महिन्याचा कालावधी उरला आहे. कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाहून माजी पंचायत समिती सदस्य विनोद जोगदंड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांच्याशी बुधवारी चर्चा केली. यावेळी जोगदंड यांनी यावर्षीची नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय शेतक-यांच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची जाणीव अधिका-यांना करून दिली. सदर विहिरींच्या बांधकामाला मुदतवाढ देवून कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोगदंड यांनी केली.

दरम्यान, एकिकडे शासनाने जवाहर धडक सिंचन विहिर योजना, नरेगातून धडक सिंचन विहिर योजनेत वर्ग करण्यात आलेल्या विहिरी व रद्द केलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरीला ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गतच्या सिंचन विहिरीला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने टाळाटाळ चालविल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर