शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम : जिल्ह्यात परतले २७ हजार नागरिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 10:44 IST

ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार २०९ नागरिक आपापल्या परत गावी आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यातत प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. ते आता परत येत असून, आरोग्य तपासणी केली जात आहे.ग्रामीण भागात २३ हजार २०९ नागरिकगेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यातील ग्रामीण भागांत तब्बल २३ हजार २०९ नागरिक, तर शहरी भागांत ४ हजार नागरिक परत आले आहेत.

गावाकडे नागरिकांची धावजिल्ह्यातील बरीच मंडळीही महानगरात किंवा विदेशात नोकरीसाठी स्थायिक झालेली आहेत. आता जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यावर उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लसीची निर्मितीही झालेली नाही. त्यामुळे जिवाच्या भीतीने विदेशात, परराज्यात आणि राज्यातील महानगरांत गेलेल्या नागरिकांनी आपापाल्या गावी धाव घेतली आहे.विदेशातून परतलेले ३२ नागरिक स्वस्थविविध कारणानिमित्त विदेशात गेलेले ३२ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या सर्वांनाच होम कॉरन्टिनमध्ये ठेवण्यात आले. त्यापैकी २१ जण होम कॉरन्टिमधून बाहेरही पडले असून, आता केवळ ११ जण होम क्वॉरन्टिंनमध्ये असले तरी, एकातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.

अद्याप एकही संशयित नाहीगेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २७ हजार नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या नागरिकांची तपासणी केली असून, आजवर एकही नागरीक संशयित नाही.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस