शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:12 IST

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात  तीन मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांतही सध्या अपेक्षीत जलसाठा नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता वाढत आहे. ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर अनेक गावातील विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ४.३८ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात येत आहेत. विहिर अधिग्रहणासंदर्भात ८० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत तर टँकरसंदर्भात १५ प्रस्ताव आहेत. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली नाही. परिणामी, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रचंड गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात यंत्रणा गुंतलेली असल्याने पाणीटंचाई निवारणार्थच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. टँकरच्या प्रस्तावांना अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकºयांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे. गलमगाव येथे पाण्यासाठी झूंबडमानोरा तालुक्यातील गलमगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडल्यामुळे गावातील एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकला आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीमधून तहसिल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रमाणेच राजूरा परिसरातील राजूरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी आदी गावांमध्येही तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई