शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:12 IST

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात  तीन मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांतही सध्या अपेक्षीत जलसाठा नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता वाढत आहे. ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर अनेक गावातील विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ४.३८ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात येत आहेत. विहिर अधिग्रहणासंदर्भात ८० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत तर टँकरसंदर्भात १५ प्रस्ताव आहेत. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली नाही. परिणामी, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रचंड गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात यंत्रणा गुंतलेली असल्याने पाणीटंचाई निवारणार्थच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. टँकरच्या प्रस्तावांना अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकºयांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे. गलमगाव येथे पाण्यासाठी झूंबडमानोरा तालुक्यातील गलमगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडल्यामुळे गावातील एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकला आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीमधून तहसिल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रमाणेच राजूरा परिसरातील राजूरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी आदी गावांमध्येही तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई