शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:12 IST

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात  तीन मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांतही सध्या अपेक्षीत जलसाठा नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता वाढत आहे. ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर अनेक गावातील विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ४.३८ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात येत आहेत. विहिर अधिग्रहणासंदर्भात ८० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत तर टँकरसंदर्भात १५ प्रस्ताव आहेत. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली नाही. परिणामी, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रचंड गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात यंत्रणा गुंतलेली असल्याने पाणीटंचाई निवारणार्थच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. टँकरच्या प्रस्तावांना अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकºयांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे. गलमगाव येथे पाण्यासाठी झूंबडमानोरा तालुक्यातील गलमगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडल्यामुळे गावातील एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकला आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीमधून तहसिल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रमाणेच राजूरा परिसरातील राजूरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी आदी गावांमध्येही तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई