शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

'कोरोना'पासून बचावासाठी ग्रामस्थांचे शेतशिवारात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नाही. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता वाशिम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नाही. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील अनेक ठिकाणचे ग्रामस्थ वास्तव्यासाठी शेतशिवारात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात दिसू लागल्यानंतर या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आवश्यक ती खबरदारी घेत आहे. कधी तोंडाला कापड न शिवणारी मंडळीही आता मास्क, रुमाल बांधून वावरताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यात ग्रामीण भागातील जनतेत मात्र मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठी भीती पसरली आहे. परजिल्ह्यातून परतलेल्या २३२०९ नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांना १४ दिवस घरात थांबण्याचा, कोणाशीही संपर्क न ठेवण्याच्या सुचना दिल्या. या लोकांच्या संपर्कात येण्यामुळे किंवा इतरही कारणांमुळे आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने विविध गावातील मंडळी मुलाबाळांसह शेतशिवारात वास्तव्यासाठी धाव घेत असल्याचे दिसत आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर, राजुरा आणि भामटवाडी, तर मानोरा तालुक्यातील सावळी येथील निम्म्याहून अधिक परिवारांनी ट्रॅक्टरमध्ये बिºहाड वाहून नेत शेतशिवारात बस्तान मांडले आहे. काहींनी शेतात शेतमाल ठेवण्यासाठी केलेले पक्के बांधकाम त्यांना उपयोगी पडत आहे.

जिवनावश्यक वस्तंूचा पुरेसा साठागावखेडे सोडून शेतशिवारात गेल्यानंतर खाण्यापिण्याच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबांनी किमान १५ ते २० दिवस पुरेल एवढे आवश्यक साहित्यच सोबत नेले आहे. त्यात अन्नधान्यासह इतर वस्तूंचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत गावात न परतण्याचा निर्णय या कुटुंबांनी घेतला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी दक्षता म्हणून मुलाबाळासह गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील स्वत:च्या शेतात खोपडी बांधून वास्तव्य केले आहे.-नामदेव ग्यानुजी ढोंबळे,शेतकरी, राजुरा

जनतेच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होऊ नये, यासाठी घरात थांबण्याचा आणि गर्दी न करण्याच्या सुचना प्रत्येकाला दिल्या; परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठी भीती निर्माण झाल्याने गावातील काही परिवारांनी वास्तव्यासाठी शेतशिवारात धाव घेतली आहेगोपाल शेळके,पोलीस पाटील, सावळी (मानोरा)

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस