शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

 वीजप्रश्नी शिरपूरच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:11 IST

शिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. अनियमित वीजपुरवठा व भारनियमनामुळे मागील महिनाभरापासून शिरपूर, वाघी, खंडाळा, कोठा, ढोरखेडा, तिवळी यासह इतर गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामाच्या हरभरा, गहू पेरणी करण्यासाठी सिंचन आवश्यक आहे. मात्र, जादा भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यातच खंडोबा फिडरवर कार्यरत असलेले लाईनमन गोरे हे मुख्यालयी राहत नसल्याने अडचणींत भर पडल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शिरपूरचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घातला. शेतकºयांच्या समस्या तात्काळ निकाली काढून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा २२ आॅक्टोबर रोजी शिरपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विश्वनाथ वाघ, संदीप शिंदे, आशिष खिल्लारे, नितीन वाघ, वैजनाथ शिंदे, अंकुश शिंदे, ज्ञानबा ईढोळे, नाथा पाटील, अंकुश शिंदे, ज्ञानबा इढोळे, अनिकेत ढंगारे, शिवाजी शिंदे, राजू सोळंके, साहेबराव शिंदे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.किनखेडा परिसरातील शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावररिसोड तालुक्यातील किनखेडा येथील वीजपुरवठा गत चार दिवसांपासून ठप्प असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्या नेतृत्वात किनखेडा येथील शेतकºयांनी १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यापूर्वी किनखेडा येथे केशवनगर वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा होत होता. आता देगाव येथील उपकेंद्रावरून वीजपुरवठा जोडण्यात आला. मात्र, या उपकेंद्रावरून योग्य दाबात वीजपुरवठा होत नसल्याने गत चार दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. यासंदर्भात दिलीप देशमुख, स्वप्नील सरनाईक यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. किनखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या निकाली काढली जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनmahavitaranमहावितरण