शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

 वीजप्रश्नी शिरपूरच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:11 IST

शिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. अनियमित वीजपुरवठा व भारनियमनामुळे मागील महिनाभरापासून शिरपूर, वाघी, खंडाळा, कोठा, ढोरखेडा, तिवळी यासह इतर गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामाच्या हरभरा, गहू पेरणी करण्यासाठी सिंचन आवश्यक आहे. मात्र, जादा भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यातच खंडोबा फिडरवर कार्यरत असलेले लाईनमन गोरे हे मुख्यालयी राहत नसल्याने अडचणींत भर पडल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शिरपूरचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घातला. शेतकºयांच्या समस्या तात्काळ निकाली काढून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा २२ आॅक्टोबर रोजी शिरपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विश्वनाथ वाघ, संदीप शिंदे, आशिष खिल्लारे, नितीन वाघ, वैजनाथ शिंदे, अंकुश शिंदे, ज्ञानबा ईढोळे, नाथा पाटील, अंकुश शिंदे, ज्ञानबा इढोळे, अनिकेत ढंगारे, शिवाजी शिंदे, राजू सोळंके, साहेबराव शिंदे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.किनखेडा परिसरातील शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावररिसोड तालुक्यातील किनखेडा येथील वीजपुरवठा गत चार दिवसांपासून ठप्प असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्या नेतृत्वात किनखेडा येथील शेतकºयांनी १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यापूर्वी किनखेडा येथे केशवनगर वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा होत होता. आता देगाव येथील उपकेंद्रावरून वीजपुरवठा जोडण्यात आला. मात्र, या उपकेंद्रावरून योग्य दाबात वीजपुरवठा होत नसल्याने गत चार दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. यासंदर्भात दिलीप देशमुख, स्वप्नील सरनाईक यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. किनखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या निकाली काढली जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनmahavitaranमहावितरण