शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

 वीजप्रश्नी शिरपूरच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:11 IST

शिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. अनियमित वीजपुरवठा व भारनियमनामुळे मागील महिनाभरापासून शिरपूर, वाघी, खंडाळा, कोठा, ढोरखेडा, तिवळी यासह इतर गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामाच्या हरभरा, गहू पेरणी करण्यासाठी सिंचन आवश्यक आहे. मात्र, जादा भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यातच खंडोबा फिडरवर कार्यरत असलेले लाईनमन गोरे हे मुख्यालयी राहत नसल्याने अडचणींत भर पडल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शिरपूरचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घातला. शेतकºयांच्या समस्या तात्काळ निकाली काढून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा २२ आॅक्टोबर रोजी शिरपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विश्वनाथ वाघ, संदीप शिंदे, आशिष खिल्लारे, नितीन वाघ, वैजनाथ शिंदे, अंकुश शिंदे, ज्ञानबा ईढोळे, नाथा पाटील, अंकुश शिंदे, ज्ञानबा इढोळे, अनिकेत ढंगारे, शिवाजी शिंदे, राजू सोळंके, साहेबराव शिंदे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.किनखेडा परिसरातील शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावररिसोड तालुक्यातील किनखेडा येथील वीजपुरवठा गत चार दिवसांपासून ठप्प असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्या नेतृत्वात किनखेडा येथील शेतकºयांनी १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यापूर्वी किनखेडा येथे केशवनगर वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा होत होता. आता देगाव येथील उपकेंद्रावरून वीजपुरवठा जोडण्यात आला. मात्र, या उपकेंद्रावरून योग्य दाबात वीजपुरवठा होत नसल्याने गत चार दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. यासंदर्भात दिलीप देशमुख, स्वप्नील सरनाईक यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. किनखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या निकाली काढली जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनmahavitaranमहावितरण