शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पाण्यासाठी भोयणीवासिंयाचे कारंजा-मानोरा मार्गावर आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:51 IST

चौसाळा: उपाय योजना न झाल्याने अखेर ३ एप्रिल रोजी गोरसेना धमरणी महिला संघटनेच्यावतीने कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्यात आला.

ठळक मुद्दे ३ एप्रिल रोजी कारंजा-मानोरा मार्गावर भोयणी फाट्यानजिक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

चौसाळा: मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून वारंवार पाठपुरावाही, तसेच प्रशासनाकडून दखलच घेण्यात येत नसल्याने आंदोलनाचाही इशाराही देण्यात आला. त्यानंतरही उपाय योजना न झाल्याने अखेर ३ एप्रिल रोजी गोरसेना धमरणी महिला संघटनेच्यावतीने कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्यात आला. त्यावेळी तहसीलदारांच्यावतीने नायब तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होत, येत्या दोन दिवसांत ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मानोरा तालुक्यातील भोयणी येथे गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतने सभेत ठराव घेऊन टँकरने किंवा इतर उपाय करून गावात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यानंतरही महिनाभर त्या प्रस्तावाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मानोराच्या तहसीलदारांकडे २३ मार्च रोजी निवेदन सादर करून रास्तारोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे २८ मार्च रोजी करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु २ एप्रिलपर्यंतही यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गोरसेना धरमणी महिला संघटनेच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी कारंजा-मानोरा मार्गावर भोयणी फाट्यानजिक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील जनतेसह गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण यांनी नायब तहसीलदार भोसले यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून येत्या दोन दिवसांत येथील पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रास्तारोको आंदोलनात गावातील वृद्ध महिला, पुरुषांसह युवकांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराWaterपाणीagitationआंदोलन