शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पांदन रस्त्यासाठी किन्हीराजावासी आक्रमक ; ३०० ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:25 IST

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देरामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे.शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते.

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून हा रस्ता  नियमानुसार वहिवाटीसाठी मोकळा न केल्यास सरपंचांसह ३०० ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. 

मालेगाव तालुक्यातील  किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे. मालेगावच्या तत्कालीन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये या रस्त्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आले होते; परंतु शेतामधील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तेव्हपासून या रस्त्याचे काम अर्धवट असून, यामुळे रामराववाडी व पिंपळशेंडा गावातील ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे; परंतु तो बंद पडल्याने  येथील पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते. पांदन रस्त्याची स्थिती वाईट असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, तर पायी चालणेही कठीण आहे. त्यामुळे या गावातील जनतेला अमानवाडीचा बाजार किंवा आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणे कठीण झाले आहे. याच मार्गाने धामणगाव येथे पायदळ दिंड्या जातात. त्यात नवेगाव, चोंढी, मेडशी, चारमोळी, पाचरण, काळा कामकामठा, उमरवाडी, मेडशी, ब्राम्हणवाडा, मारसूळसह १५ ते २० गावातील वारकरी सहभागी होतात. या सर्व वारकºयांना अतोनात अडचणींचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या संदर्भात पिंपळशेंडा आणि रामराववाडी येथील ग्रामस्थांनीही प्रशासन दरबारी या रस्त्याची समस्या वेळोवेळी मांडून त्याचे काम करून वहिवाटीसाठी मोकळा करण्याची मागणी केली; परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे किन्हीराजाचे सरपंच सुनिल घुगे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ३०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करीत या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच