शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

पांदन रस्त्यासाठी किन्हीराजावासी आक्रमक ; ३०० ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:25 IST

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देरामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे.शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते.

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून हा रस्ता  नियमानुसार वहिवाटीसाठी मोकळा न केल्यास सरपंचांसह ३०० ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. 

मालेगाव तालुक्यातील  किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे. मालेगावच्या तत्कालीन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये या रस्त्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आले होते; परंतु शेतामधील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तेव्हपासून या रस्त्याचे काम अर्धवट असून, यामुळे रामराववाडी व पिंपळशेंडा गावातील ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे; परंतु तो बंद पडल्याने  येथील पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते. पांदन रस्त्याची स्थिती वाईट असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, तर पायी चालणेही कठीण आहे. त्यामुळे या गावातील जनतेला अमानवाडीचा बाजार किंवा आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणे कठीण झाले आहे. याच मार्गाने धामणगाव येथे पायदळ दिंड्या जातात. त्यात नवेगाव, चोंढी, मेडशी, चारमोळी, पाचरण, काळा कामकामठा, उमरवाडी, मेडशी, ब्राम्हणवाडा, मारसूळसह १५ ते २० गावातील वारकरी सहभागी होतात. या सर्व वारकºयांना अतोनात अडचणींचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या संदर्भात पिंपळशेंडा आणि रामराववाडी येथील ग्रामस्थांनीही प्रशासन दरबारी या रस्त्याची समस्या वेळोवेळी मांडून त्याचे काम करून वहिवाटीसाठी मोकळा करण्याची मागणी केली; परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे किन्हीराजाचे सरपंच सुनिल घुगे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ३०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करीत या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच