शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पांदन रस्त्यासाठी किन्हीराजावासी आक्रमक ; ३०० ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:25 IST

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देरामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे.शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते.

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून हा रस्ता  नियमानुसार वहिवाटीसाठी मोकळा न केल्यास सरपंचांसह ३०० ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. 

मालेगाव तालुक्यातील  किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे. मालेगावच्या तत्कालीन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये या रस्त्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आले होते; परंतु शेतामधील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकºयांनी या पांदन  रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तेव्हपासून या रस्त्याचे काम अर्धवट असून, यामुळे रामराववाडी व पिंपळशेंडा गावातील ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे; परंतु तो बंद पडल्याने  येथील पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते. पांदन रस्त्याची स्थिती वाईट असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, तर पायी चालणेही कठीण आहे. त्यामुळे या गावातील जनतेला अमानवाडीचा बाजार किंवा आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणे कठीण झाले आहे. याच मार्गाने धामणगाव येथे पायदळ दिंड्या जातात. त्यात नवेगाव, चोंढी, मेडशी, चारमोळी, पाचरण, काळा कामकामठा, उमरवाडी, मेडशी, ब्राम्हणवाडा, मारसूळसह १५ ते २० गावातील वारकरी सहभागी होतात. या सर्व वारकºयांना अतोनात अडचणींचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या संदर्भात पिंपळशेंडा आणि रामराववाडी येथील ग्रामस्थांनीही प्रशासन दरबारी या रस्त्याची समस्या वेळोवेळी मांडून त्याचे काम करून वहिवाटीसाठी मोकळा करण्याची मागणी केली; परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे किन्हीराजाचे सरपंच सुनिल घुगे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ३०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करीत या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच