शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:51 IST

चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गत आठवड्यापासून सुरू केली आहे. आतापर्यंत २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन केले असून, गावात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून या दलाचे सदस्य तैनात केले आहेत. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असून, एप्रिल महिन्यापर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये व बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक गावात प्रशासनाच्यावतीने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे शक्य होत नाही. या पृष्ठभूमीवर ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण मोटारसायकलवर गावात चकरा मारू नये यावर ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पदाधिकारी वॉच ठेवत आहेत. आतापर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली असून, प्रत्येक वार्डात दोन ते तीन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. सुरक्षा रक्षक गावात कोरोनाविषयी जनजागृती करत करीत असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर निघू नका, असा संदेश गावकऱ्यांना देत आहेत. बाहेर गावावरुन येणाºया नागरिकांना अडवून सर्वप्रथम इत्यंभूत चौकशी केली जाते. त्यानंतर अत्यावश्यकता असेल तरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेश दिला जातो अन्यथा प्रवेश नाकारला जातो.

गावकºयांनो, कोरोना विषाणूचे गांभीर्य ओळखा !कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरून गेले असून, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर सोपविली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाईदेखील केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, संचारबंदीच्या काळात संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले.

कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शासन व जिल्हा प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पोलीस प्रशासनातर्फे केली जात आहे. ग्रामीण भागातही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या कामी ग्राम सुरक्षा दलाचे सहकार्य घेतले जात असून, नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून विनाकारण घराबाहेर पडू नये.

- डॉ. पवन बनसोडसहायक पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस