शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:51 IST

चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गत आठवड्यापासून सुरू केली आहे. आतापर्यंत २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन केले असून, गावात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून या दलाचे सदस्य तैनात केले आहेत. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असून, एप्रिल महिन्यापर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये व बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक गावात प्रशासनाच्यावतीने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे शक्य होत नाही. या पृष्ठभूमीवर ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण मोटारसायकलवर गावात चकरा मारू नये यावर ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पदाधिकारी वॉच ठेवत आहेत. आतापर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली असून, प्रत्येक वार्डात दोन ते तीन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. सुरक्षा रक्षक गावात कोरोनाविषयी जनजागृती करत करीत असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर निघू नका, असा संदेश गावकऱ्यांना देत आहेत. बाहेर गावावरुन येणाºया नागरिकांना अडवून सर्वप्रथम इत्यंभूत चौकशी केली जाते. त्यानंतर अत्यावश्यकता असेल तरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेश दिला जातो अन्यथा प्रवेश नाकारला जातो.

गावकºयांनो, कोरोना विषाणूचे गांभीर्य ओळखा !कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरून गेले असून, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर सोपविली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाईदेखील केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, संचारबंदीच्या काळात संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले.

कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शासन व जिल्हा प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पोलीस प्रशासनातर्फे केली जात आहे. ग्रामीण भागातही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या कामी ग्राम सुरक्षा दलाचे सहकार्य घेतले जात असून, नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून विनाकारण घराबाहेर पडू नये.

- डॉ. पवन बनसोडसहायक पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस