शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:42 IST

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगतीशिल शेतकऱ्यांचे तथा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली असून शेतात पिकणारा माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. असे असताना रस्त्याच्या तद्वतच अन्य स्वरूपातील विकासाच्या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया मालेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये घाटा या गावाचा अग्रक्रम लागतो. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये या गावातील शेतकºयांकडून विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बहुतांश शेतकºयांनी शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतमालाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे; मात्र शेतात पिकणारा माल बाजारपेठेत पोहचविण्याकरिता घाटा या गावाला पांगरखेडामार्गे शिरपूर अशा रस्त्याची उपलब्धी अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे विविध स्वरूपातील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटा ते पांगरखेडा फाट्यापर्यंत पक्की सडक उभारण्याची मागणी सरपंच फलांगा रमेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली. घाटा या गावापासून पांगरखेडा फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक प्रयोगशिल शेतकºयांची शेती वसलेली आहे. तसेच पांगरखेडा फाट्यापासून काही अंतरावर नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग आहे. या फाट्यापासून शिरपूरमध्ये जाण्याकरिता केवळ चार किलोमिटरचे अंतर पार करावे लागते; मात्र हा रस्ता लालफितशाहीत अडकून असल्याने सद्या घाटा ते किन्ही घोडमोड आणि तेथून शिरपूर असे मोठे अंतर पार करावे लागत आहे. यामुळे विशेषत: शेतकºयांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभागFarmerशेतकरी