शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ध्यास ग्रामस्वच्छतेचा; माजी सरपंच गोळा करतात कचरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:09 IST

अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात.

- अमोल कल्याणकर मालेगाव (वाशिम): येथूनच जवळ असलेल्या अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात, तसेच कचºयाची स्वत:च विल्हेवाट लावतात. ग्रामस्वच्छतेचा त्यांचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. अंचळ येथील कुंडलिक जनार्दन जुनघरे हे विद्यमान सरपंच संगीता जुनघरे यांचे पती आहेत. मात्र, सरपंच पती असल्याचा कुठलाच आर्विभाव ते दाखवित नाहीत. लहान वयातच पित्याने आत्महत्याब केल्यानंतर पितृछत्र हरविलेल्या कुंडलिक जुनघरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. उदरभरणासाठी आधार नसल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम केले. फावल्या वेळेत जनतेची कामेही त्यांनी मोफत केली. त्यामुळे ते गावातील सर्वाचे आवडते व्यक्ती झाले. अशात त्यांच्याकडे गावचे सरपंच पद आले. मागील दोन पंचवार्षिक कालावधित त्यांनी हे पद भुषविले. सद्यस्थितीत त्यांच्या पत्नीकडे सरपंच पद आहे. पत्नी सरपंच असतानाही त्यांच्यात कसलाही अहंभाव निर्माण झाला नाही. गावच्या स्वच्छतेसाठी ते स्वत: कचरा संकलन करतात यातूनच त्यांचे साधे व्यक्तीमत्त्व दिसून येते.  गाव स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. एक दिवसही न चुकता गावातील सर्व कचरा संकलित करतात गावातील स्वत:  फिरूून ओला व सुका कचरा गोळ्या करुन गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावतात  त्याशिवाय गावात स्वत:च धूर फवारणी करून गावात स्वच्छतेचा जागर ते करीत आहेत. सात सदस्य असलेल्या त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ३ कर्मचारी असतानाही अनेक वषार्पासून हे काम ते स्वत: करीत आहेत. त्यांच्या या कार्यात बळीराम वानखडे हेसुद्धा त्यांना तितक्याच नेटाने कोणताही मोबदला न घेता सहकार्य करत आहेत. स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वत: जवळून पैसे खर्च करून वृक्षारोपण करतानाच ३०० वृक्षांना त्यांनी सुरक्षाकवच त्यांनी बसवले. या वृक्षांना ते स्वत: पाणी घालत आहेत. 

  गाव केले हागणदारीमुक्त कुंडलिक जुनघरे यांनी अंचळ या गावात शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी गावकºयांना प्रोत्साहित केले आणि ते काम त्यांच्याकडून करून घेतले. त्यामुळे आज गाव हागणदारी मुक्त झाले आहे. आजच्या परिस्थितीतही ते  स्वत: नित्यनेमाने स्वच्छता करतात त्यामुळेच गावातील उघड्यावरील शौचवारी बंद झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान