शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ध्यास ग्रामस्वच्छतेचा; माजी सरपंच गोळा करतात कचरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:09 IST

अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात.

- अमोल कल्याणकर मालेगाव (वाशिम): येथूनच जवळ असलेल्या अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात, तसेच कचºयाची स्वत:च विल्हेवाट लावतात. ग्रामस्वच्छतेचा त्यांचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. अंचळ येथील कुंडलिक जनार्दन जुनघरे हे विद्यमान सरपंच संगीता जुनघरे यांचे पती आहेत. मात्र, सरपंच पती असल्याचा कुठलाच आर्विभाव ते दाखवित नाहीत. लहान वयातच पित्याने आत्महत्याब केल्यानंतर पितृछत्र हरविलेल्या कुंडलिक जुनघरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. उदरभरणासाठी आधार नसल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम केले. फावल्या वेळेत जनतेची कामेही त्यांनी मोफत केली. त्यामुळे ते गावातील सर्वाचे आवडते व्यक्ती झाले. अशात त्यांच्याकडे गावचे सरपंच पद आले. मागील दोन पंचवार्षिक कालावधित त्यांनी हे पद भुषविले. सद्यस्थितीत त्यांच्या पत्नीकडे सरपंच पद आहे. पत्नी सरपंच असतानाही त्यांच्यात कसलाही अहंभाव निर्माण झाला नाही. गावच्या स्वच्छतेसाठी ते स्वत: कचरा संकलन करतात यातूनच त्यांचे साधे व्यक्तीमत्त्व दिसून येते.  गाव स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. एक दिवसही न चुकता गावातील सर्व कचरा संकलित करतात गावातील स्वत:  फिरूून ओला व सुका कचरा गोळ्या करुन गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावतात  त्याशिवाय गावात स्वत:च धूर फवारणी करून गावात स्वच्छतेचा जागर ते करीत आहेत. सात सदस्य असलेल्या त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ३ कर्मचारी असतानाही अनेक वषार्पासून हे काम ते स्वत: करीत आहेत. त्यांच्या या कार्यात बळीराम वानखडे हेसुद्धा त्यांना तितक्याच नेटाने कोणताही मोबदला न घेता सहकार्य करत आहेत. स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वत: जवळून पैसे खर्च करून वृक्षारोपण करतानाच ३०० वृक्षांना त्यांनी सुरक्षाकवच त्यांनी बसवले. या वृक्षांना ते स्वत: पाणी घालत आहेत. 

  गाव केले हागणदारीमुक्त कुंडलिक जुनघरे यांनी अंचळ या गावात शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी गावकºयांना प्रोत्साहित केले आणि ते काम त्यांच्याकडून करून घेतले. त्यामुळे आज गाव हागणदारी मुक्त झाले आहे. आजच्या परिस्थितीतही ते  स्वत: नित्यनेमाने स्वच्छता करतात त्यामुळेच गावातील उघड्यावरील शौचवारी बंद झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान