शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

vidhan sabha 2019 : सेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:43 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भाजपाकडून आमदार म्हणून नेतृत्व करित असलेल्या जिल्ह्यातील वाशिम, कारंजा या मतदारसंघांसोबतच रिसोड मतदारसंघावरही भाजपाने दावा ठोकला आहे. दुसरीकडे शिवसेनाही तीन्ही मतदारसंघांमध्ये लढण्यास इच्छुक आहे. अशात युती झाल्यास प्रामुख्याने शिवसेनेच्याच मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तुलनेने जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.वाशिम मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करित असलेले लखन मलिक भाजपाकडून यंदा पुन्हा उमेदवारीची ‘डिमांड’ करित आहेत; मात्र युती न झाल्यास मलिकांना २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.कारंजा लाड विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेतून भाजपात पक्षप्रवेश करून निवडणूक लढलेल्या राजेंद्र पाटणी यांचा २०१४ च्या निवडणूकीत केवळ ४१४७ मतांनी विजय झाला होता. यंदा शिवसेनेत महत्वाचे स्थान मिळवून असलेले राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार प्रकाश डहाके यांना सेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आणि युती तुटल्यास पाटणींचा विजय सोपा नसणार, अशी चर्चा होत आहे.रिसोड मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून अमीत झनक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याकरिता अनेकजण इच्छुक असून शिवसेनेने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही या मतदारसंघात तगडा उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली गतीमान झाल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, अमीत झनक, लखन मलिक आदिंचा समावेश आहे.

काँग्रेस-रा.काँ. च्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्षआगामी विधानसभा निवडणुकीत युती तुटणार की भाजपा-सेना सोबत लढणार, यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस-रा.काँ.ची भूमिका नेमकी काय राहणार, कोणते उमेदवार दिले जाणार, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

९.५३ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्कयंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये महिला व पुरूष असे एकंदरित ९ लाख ५३ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ३३-रिसोड मतदारसंघात ३३१ मतदान केंद्र राहणार असून वाशिम मतदारसंघात ३६९ आणि कारंजा लाड मतदारसंघात ३५२ असे एकूण १०५२ मतदान केंद्र असणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण