शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

VIDEO - शिक्षणाधिका-यांच्या कक्षात भरली वडपची शाळा

By admin | Updated: July 4, 2017 14:54 IST

ऑनलाइन लोकमत  राजुरा, दि. 4-  मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने ...

ऑनलाइन लोकमत 

राजुरा, दि. 4-  मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शाळा समितीसह ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देवून शिक्षक भरण्याची मागणी केली होती. शिक्षक भरती न केल्यास आपल्या कक्षात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार ४ जुलै रोजी गटशिक्षणाधिका-यांच्या कक्षात वडपची शाळा भरविण्यासत आली.
 
मालेगाव पंचायत समिती अंतर्गंत येत असलेल्या वडप येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून एकूण पटसंख्या १२० आहे. या शाळेत एक मुख्याध्यापक व तीन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
 
याकरिता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालु तुळशिराम गायकवाड, उपसरपंच  भगवान गोरख बोरकर, समाजसेवक सिताराम नामेदवराव कावळे, शाळा समिती सदस्य विनोद दत्तराव गायकवाड, गणेश नारायण जाधव, बालाजी सुभाष तटाले, गणेश देवबा बोरकर, रमेश पांडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना २८ जून रोजी निवेदन देवून दोन शिक्षकांची नियुक्ती  ७ दिवसाच्या आत करण्यात यावी अशी मागणी करुन नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा व शाळा पंचायत समितीमध्ये भरविण्याचा इशारा दिला होता. 
 
सात दिवसाचा अवधी उलटून गेल्यानंतरही यावर कोणत्याच प्रकारची कारवाई न करण्यात आल्याने नागरिकांनी ४ जुलै रोजी गटशिक्षणधिका-यांच्या कक्षात शाळा भरविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधितांशी चर्चा व निवेदन देण्याकरीता त्यावेळी एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हते. शिक्षणाधिकारी सुटीवर तर विस्तार अधिकारी व ईतर अधिकारी मिटींगमध्ये असल्याचेसांगून भ्रमणध्वनी ठेवून दिला. त्यामुळे विद्यार्थी १० वाजतापासून कार्यालयातच बसून होते. याची वरीष्ठांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
https://www.dailymotion.com/video/x84571u