शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:29 IST

तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी विभागाच्या सुचनेनुसार यंदाच्या हंगामात न उगवलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तातडीने बदलून द्यावे लागणार आहे. तथापि, आठवडा उलटून गेला तरी, तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. शिवाय, त्यातच अद्यापही न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा गोंधळ उडत आहे.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. आता या संदर्भात विशेष नमुन्यात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा लागणार आहे; परंतु कृषी विभागाची पाहणीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अहवाल प्रलंबित आहे.

शेतकºयांसह कंपनीलाही अहवालजिल्ह्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, किती क्षेत्रावर बियाणे उगवले नाही. बियाणे न उगवण्याच कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल संबंधित शेतकरी आणि बियाणे उत्पादक कंपनीलाही सादर करावा लागणार आहे. बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याशिवाय शासनस्तरावर सादर करण्यासाठीही एक सर्वकश अहवाल तालुकास्तर समितीला तयार करावा लागणार आहे.

न उगवलेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्याच अहवाल तयार करीत आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या तक्रारींमुळे ही प्र्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय अहवालाची प्रक्रिया अत्यंत बारकाईने पूर्ण करावी लागणार आहे.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र