शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

भाजीपाल्याच्या दरात वाढ सुरूच; गृहिणींचे बजेट घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 15:52 IST

Washim News भाज्यांचे दर दुपटीनेच वाढल्यामुळे गृहिणी अडचणीत सापडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात  गेल्या काही  दिवसांपासून भाजीपाल्याच्या मागणीत सतत वाढ सुरू आहे.   त्यात कडधान्याच्या दरातील वाढही कायम असून,  बहुतांश डाळीचे दर १०० ते १२० रुपये प्रती  किलो  असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वयंपाक घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. राज्यात अनेक ठिकाणी  पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. याचा  फटका भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट आली.  परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात डाळींचे दरही १२० रुपये प्रती किलोच्या घरात पोहोचले आहेत. या सगळ्यामुळे आता सामान्य घरातील गृहिणींचे बजेट कोलमडलेलेच आहे.  जिल्ह्यात फुलकोबी १२० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, मेथी ८० रुपये, पालक ६० रुपये,  दाेडके ६० रुपये, कोथिंबीर २०० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, कारली ८०  ते १०० रुपये, बटाटे ६० रुपये, कांदे ६० ते ८० रुपये, लसूण १६० रुपये प्रति किलोदराने मिळत आहे. इतरही भाज्यांचे दर दुपटीनेच वाढल्यामुळे गृहिणी अडचणीत सापडल्या आहेत.

 प्रत्येकच भाजी महागली आहे. डाळींचे दर, तर १२० रुपयांपेक्षा अधिक असल्याने स्वयंपाक घराचे बजेटच कोलमडले आहे. भाजीसाठीच मोठा खर्च करावा लागतो. - संगीता इंगोले, गृहिणी,  वाशिम

परतीच्या पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले, त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली बाजारात दर वाढले  तरी आम्हाला मात्र त्याचा फायदा नाही.   - संतोष भोजापुरे,     उत्पादक, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार