शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:50 IST

सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा येथील रहिवासी तथा मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत सुनील विठ्ठलराव धोपे (३७) हे १५ सप्टेंबर  २०१८ रोजी कर्तव्यावर असताना सकाळच्या दरम्यान संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कारवाई व्हावी, सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सुनील धोपे यांचे पार्थिव १७ सप्टेंबर २०१८ रोजी कारंजात आणले होते. धोपे यांची हत्या झाल्याचा आरोप करून धोपे कुटुंबीयांनी त्यास कारणीभूत असणाºया सीमा सुरक्षा दलातील पाच अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्या लावून धरल्या होत्या. अन्यायाच्या विरोधात १८ ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत कारंजा बंदची हाकही दिली होती. याप्रकरणी कारंजा पोलिसांत ‘झीरो एफआयआर’अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या संबंधित पाच अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण सिलाँग पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते. तेव्हापासून आतापर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कोणतीही ठोस कार्यवाही नसल्याचा आरोप करीत मृतक सुनील धोपे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई धोपे, पत्नी सविता धोपे यांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. याप्रकरणी सीबीआय किंवा चौकशी पथक नियुक्ती करून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना शिक्षा करण्यात यावी, कारवाई करण्यास विलंब का झाला याकरिता योग्य ती माहिती देण्यात यावी, दोषी अधिकारी व कर्मचारी मोठया पदावर असल्यामुळे अद्याप त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, परत शवविच्छेदन करण्याची धोपे कुटुंबियांची मागणी फेटाळण्यात का आली, सुनील यांना शहीद जवानाचा दर्जा देण्यात यावा, धोपे कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, कारंजा लाड येथे जागा देवून मृतक सुनील यांचा पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्या यावेळी धोपे कुटुंबियांनी केल्या. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी लक्ष्मीबाई धोपे, सविता धोपे, सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव, आरटीआय कार्यकर्ते विनोद जाधव आदींनी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनKaranjaकारंजा