शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 17:49 IST

मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप पिकावरील किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांच्या वापरावर भर देत आहेत. यात सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्थुरॉन आणि प्रोफेनोफॉस यासारख्या कीटकनाशकांचा समावेश आहे. त्यामुळेच कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत असून, या किटकनाशकांचा वापर शेतर्कयांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रानीही या कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आवाहन कृषी विभाग करीत आहे.मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अमरावती विभागातील यतवमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी हा प्रकार गंभीर झाला होता, तर यंदाही अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या जिवाला धोका असल्याने कृषी विभाग व्यापक जनजागृती करण्यासह फवारणीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबवित आहेच; परंतु हा प्रकार घडण्यामागे जहाल कीकनाशकांचा वापर ही गंभीरबाबही कृषी विभागाच्या लक्षात आली आहे. प्रामुख्याने प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या मिश्रणामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीतही कीटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजूर दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले असून, उपरोक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात लाल त्रिकोणाची खुण असलेली कीटकनाशके मानवी आरोग्यास घातक असून, उपरोक्त कीटकनाशके त्याच प्रकारात मोडतात. त्यामुळे अशा कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रांनीही अशा कीटकनाशकांची विक्री टाळून, हिरवे किंवा निळे त्रिकोणाची खुण असलेल कमीतकमी विषारी कीटकनाशकांच्या वापरास आणि विक्रीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे, तसेच प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या वापरापासून शेतकऱ्यांना व विक्रीपासून कृषीसेवा केंद्रांना परावृत्त करावे, अशा सुचना कृषी विभागाच्या कर्मचाºयांनाही देण्यात आल्या आहेत. यानंतरही कीटकनाशकाच्या विषबाधा प्रकरणात कृषीसेवा केंद्रांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कीटकनाशके कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या जहाल कीटकनाशकाच्या वापरामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे या कीटकनाशकांची विक्री न करण्याचे आवाहन कृषी सेवा केंद्रांना करण्यात आले आहे, तसेच शेतकºयांनीही या कीटकनाशकांचा वापर करू नये !- डी. के. चौधरीउपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती