शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:38 IST

जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पूर्णपणे मिळत नाही; तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नववर्षातही हजेरी लावून शेतकऱ्यांना गारद केले आहे.सन २०१९ या वर्षात शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागला. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. दोन टप्प्यात हा निधी मिळाला असून, अजून संपूर्ण शेतकºयांच्या बँक खात्यावर मदत निधी जमा झाला नाही. अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने २ जानेवारीच्या पहाटे जिल्ह्यात हजेरी लावून शेतकºयांना गारद केले आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर, उमरा, देगाव, जवळा परिसरात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अनसिंग परिसरातील देगाव येथे मोठया प्रमाणात गारपिटसह वादळी पाऊस झाला. गहू, तुर, कपाशी, कांदे, इतर भाजीपाला, फळबागेचे अतोनात नुकसान झाले. शेतातील इतर झाडांची पडझड झाली. देगाव येथील शेतकरी संदीप चव्हाण, भिकाजी येवले, नवीन येवले, किशोर वारकड, विष्णु भवानसिंग, चव्हाण, वसंता भवानसिंग चव्हाण, मुंगराम किसन राठोड, किसन भवानसिंग चव्हाण, मधुकर जाधव, शंकर रामचंद्र राऊत, रामधन जाधव, जयसिंग जाधव, रामा राठोड, ज्ञानदेव चौधरी, फकीरा वारकड यांच्यासह अनेक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. वारा जहॉगीर येथील दत्ता नारायण इंगलकर, अमोल आनंद ढगे यांच्यासह १०० ते १५० शेतकºयांच्या शेतातील गव्हू पिकाची नासाडी झाली आहे. उमरा येथील १५० ते २०० शेतकºयांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातही वादळीवारा व अवकाळी पावसामुळे फळबागेसह गहू, हरभरा, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यातील वटफळ, रुई गोस्ता, शेंदुरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह १० ते १५ गावांत अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. ाारपीट झाली. कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी