शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:38 IST

जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पूर्णपणे मिळत नाही; तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नववर्षातही हजेरी लावून शेतकऱ्यांना गारद केले आहे.सन २०१९ या वर्षात शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागला. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. दोन टप्प्यात हा निधी मिळाला असून, अजून संपूर्ण शेतकºयांच्या बँक खात्यावर मदत निधी जमा झाला नाही. अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने २ जानेवारीच्या पहाटे जिल्ह्यात हजेरी लावून शेतकºयांना गारद केले आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर, उमरा, देगाव, जवळा परिसरात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अनसिंग परिसरातील देगाव येथे मोठया प्रमाणात गारपिटसह वादळी पाऊस झाला. गहू, तुर, कपाशी, कांदे, इतर भाजीपाला, फळबागेचे अतोनात नुकसान झाले. शेतातील इतर झाडांची पडझड झाली. देगाव येथील शेतकरी संदीप चव्हाण, भिकाजी येवले, नवीन येवले, किशोर वारकड, विष्णु भवानसिंग, चव्हाण, वसंता भवानसिंग चव्हाण, मुंगराम किसन राठोड, किसन भवानसिंग चव्हाण, मधुकर जाधव, शंकर रामचंद्र राऊत, रामधन जाधव, जयसिंग जाधव, रामा राठोड, ज्ञानदेव चौधरी, फकीरा वारकड यांच्यासह अनेक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. वारा जहॉगीर येथील दत्ता नारायण इंगलकर, अमोल आनंद ढगे यांच्यासह १०० ते १५० शेतकºयांच्या शेतातील गव्हू पिकाची नासाडी झाली आहे. उमरा येथील १५० ते २०० शेतकºयांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातही वादळीवारा व अवकाळी पावसामुळे फळबागेसह गहू, हरभरा, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यातील वटफळ, रुई गोस्ता, शेंदुरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह १० ते १५ गावांत अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. ाारपीट झाली. कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी