शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:38 IST

जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पूर्णपणे मिळत नाही; तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नववर्षातही हजेरी लावून शेतकऱ्यांना गारद केले आहे.सन २०१९ या वर्षात शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागला. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला होता. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. दोन टप्प्यात हा निधी मिळाला असून, अजून संपूर्ण शेतकºयांच्या बँक खात्यावर मदत निधी जमा झाला नाही. अशातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने २ जानेवारीच्या पहाटे जिल्ह्यात हजेरी लावून शेतकºयांना गारद केले आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर, उमरा, देगाव, जवळा परिसरात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अनसिंग परिसरातील देगाव येथे मोठया प्रमाणात गारपिटसह वादळी पाऊस झाला. गहू, तुर, कपाशी, कांदे, इतर भाजीपाला, फळबागेचे अतोनात नुकसान झाले. शेतातील इतर झाडांची पडझड झाली. देगाव येथील शेतकरी संदीप चव्हाण, भिकाजी येवले, नवीन येवले, किशोर वारकड, विष्णु भवानसिंग, चव्हाण, वसंता भवानसिंग चव्हाण, मुंगराम किसन राठोड, किसन भवानसिंग चव्हाण, मधुकर जाधव, शंकर रामचंद्र राऊत, रामधन जाधव, जयसिंग जाधव, रामा राठोड, ज्ञानदेव चौधरी, फकीरा वारकड यांच्यासह अनेक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. वारा जहॉगीर येथील दत्ता नारायण इंगलकर, अमोल आनंद ढगे यांच्यासह १०० ते १५० शेतकºयांच्या शेतातील गव्हू पिकाची नासाडी झाली आहे. उमरा येथील १५० ते २०० शेतकºयांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातही वादळीवारा व अवकाळी पावसामुळे फळबागेसह गहू, हरभरा, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यातील वटफळ, रुई गोस्ता, शेंदुरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह १० ते १५ गावांत अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. ाारपीट झाली. कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी