शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

गारांनी झोपला, धुक्याने जळाला; शेतकऱ्याने १० एकर हरभऱ्यावर नांगर फिरविला! 

By दिनेश पठाडे | Updated: December 5, 2023 15:09 IST

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला.

वाशिम: मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले, तर त्यानंतर पडलेल्या धुक्याने हरभऱ्याचे पीक जळून गेले. या प्रकारामुळे हाती काहीच येणार नसल्याने दोन शेतकरी बांधवांनी शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर नांगर फिरवून शेतच मोकळे केले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील शुभम नालिंदे आणि तरूण नालिंदे या युवा शेतकऱ्यांनी निराशेतून हा निर्णय घेतला.

खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर सोयाबीन हे पीक निघाल्यानंतर तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकरी बंधूनी २६२ व २६४ या गट क्रमांकातील स्वत:च्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. हे पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच किन्हीराजा परिसरात मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिटी झाली. यानंतर धुकेही पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे तरूण नालिंदे आणि शुभम नालिंदे या शेतकऱ्यांच्या शेतातील १० एकर क्षेत्रातील हरभऱ्याचे पीक पूर्णपणे पीक करपले. त्यामुळे यातून कोणतेच उत्पन्न मिळण्याची आशा उरली नाही. त्यामुळे निराश झालेल्या नालिंदे शेतकरी भावंडांनी या १० एकर क्षेत्रातील हरभरा पिकावर ५ डिसेंबर रोजी नांगर फिरवून शेतच मोकळे केले. या नुकसानापोटी प्रशासनाने शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी