शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार

By दिनेश पठाडे | Updated: November 27, 2023 21:46 IST

एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या

वाशिम : जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा बसला असून कपाशी जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. दरम्यान, वस्तूनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर नुकसानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

रविवारच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानाचा  प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश अमरावती  विभागीय आयुक्त कार्यालयाने २७ नोव्हेंबरला दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ५०.५ मीमी पावसाची नोंद झाली असून काही मंडळात अतिवृष्टी तर इतर मंडळात अवकाळी पाऊस बरसला. वाशिम तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार ४५२ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. तर एका घराची अंशत: पडझड झाली. त्याचप्रमाणे प्रकाशराव त्र्यंबकराव सरनाईक(रा. देऊळगाव बंडा, ता.रिसोड) यांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच मंगरुळपीर तहसील कार्यालयांतर्गत ४१, कारंजा ३५, मानोरा १४ अशा ९० मेंढ्यांचा तर जिल्ह्यात एका मोठ्या जनावराचा मृत्यू झाल्याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा  प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला त्यानुसार हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास  पाठविण्यात आला.  मेंढ्याच्या मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

नुकसानाचे क्षेत्र वाढणारजिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला असला तरी प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेल्या मंडळासह इतर भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची स्थिती आहे. सोमवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे पंचनामे व इतर कामे करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र, पुढील काही दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एकूण सर्व तालुक्यांतील नुकसानाची स्थिती समोर येणार आहे. तेव्हाच नेमकी कोणत्या तालुक्यात कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम