शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बॅंक बंदमुळे ग्राहकांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

मानोरा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या नियमित व्यवहाराला खातेदारांसह नागरिक कमालीचे कंटाळले असून डिपाॅझिट व विड्रॉलसाठी दिवसभर केवळ एकच काउंटर ...

मानोरा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या नियमित व्यवहाराला खातेदारांसह नागरिक कमालीचे कंटाळले असून डिपाॅझिट व विड्रॉलसाठी दिवसभर केवळ एकच काउंटर राहत असल्यामुळे नागरिकांना सर्व कामे सोडून दिवसभर बसावे लागते. शिवाय एटीएम कायमचे बंद असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागतो, परंतु शक्रवारी स्टेट बँकेने प्रमुख गेट बंद ठेवून बॅंकेचे व्यवहार दिवसभर बंदच राहिले. बॅंकेचे व्यवहार चालू होतील या आशेने शेकडो नागरिक बॅंकेच्या प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे दिसून आले. बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी ग्रामीण नागरिक आपली कामे साेडून व्यवहारासाठी बॅंकेत येतात. परंतु बॅंकेच्या आडमूठे धोरणामुळे अकारण त्रास सहन करावा लागत आहे . बॅंकेचे व्यवहार सुरळीत व पारदर्शक करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहे .

-----------

एटीएम नावालाच

खातेदारांची पैसे काढण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास पैसे मिळावे यासाठी एटीएमची स्थापना करण्यात आली . परंतु येथील एटीएम शोभेची वस्तू बनली आहे . शेकडाे ग्राहक दरराेज एटीएममध्ये जाऊन खाली हात परत असल्याने ग्राहकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.